पुणे: उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घराजवळ आढळेल्या स्कॉर्पियो गाडीचे मालक (Mansukh Hiren) यांचा मृतदेह आढळल्यानंतर या प्रकरणी विरोधी पक्षनेते आक्रमक झाले आहेत. स्फोटकांनी भरलेली गाडी उद्योगपती अंबानी यांच्या घराबाहेर कुणी उभी केली, मनसुख हिरेन यांनी आत्महत्या केली की त्यांची हत्या झाली या प्रकरणाचा तपास सुरू झाला आहे. हिरेन यांचा मृतदेह सापडल्याने या संपूर्ण प्रकरणाबाबत संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या राज्य उपाध्यक्ष (Chitra Wagh) यांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. (will there be an into the ask )

चित्रा वाघ यांनी ट्विट करत ही अपेक्षा व्यक्त केली आहे. त्या आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, ‘महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यात असे अनेक मृत्यू झाले. कधी कुणी सेलीब्रीटी तर कधी कुणी एखादी मुलगी आणि आता मनसुख हिरेन… प्रत्येक मृत्यूमागे एक रहस्य… आणि रहस्यातून बाहेर पडताहेत अनेक धक्कादायक मती गुंग करणाऱ्या गोष्टी… सगळ्या प्रकरणांची निष्पक्ष चौकशी होईल ना?.’

मुंबई पोलिसांवर विश्वास ठेवा; महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे आवाहन

राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी पोलिस करत असलेल्या तपासावर विश्वास ठेवण्याचे आवाहन केले आहे. सरकार बदलत असते पण मुंबई पोलिस तेच असतात. त्यांची कार्यपद्धती अतिशय चांगली आहे, असे थोरात यांनी म्हटले आहे.
क्लिक करा आणि वाचा-

राजकारण करण्यासाठी विरोधकांनी विरोध केला असला तरी पोलिसांवर सर्वांनी विश्वास ठेवला पाहिजे, असेही ते म्हणाले. हिरेन मृत्यूप्रकरणाचा तपास आता एटीएसकडे दिला आहे. त्यामुळे तो योग्य पद्धतीनेच होणार, याच शंका घेण्याचे कारण नाही. पोलिसांवर आरोप करणे चुकीचे आहे, असही थोरात म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा-

क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here