कोकणात रोजगार आणि विकासाचा प्रकल्प व्हावा असे लोकांना वाटत आहे. कोकणातील लोकांची भावना आता बदलली आहे. प्रकल्प व्हावा असेच लोकांना वाटत आहे. या प्रकल्पाबाबतचे लोकांचे गैरसमज आता दूर झाले आहेत. स्थानिकांनी राज ठाकरे यांना त्यांची भूमिका सांगितली असली पाहिजे. त्यामुळेच राज ठाकरेंनी नाणार प्रकल्पाला पाठिंबा दिला असावा. राज यांच्या या भूमिकेचं आम्ही स्वागतच करतो, असे राणे म्हणाले. भारतीय जनता पक्षाने या प्रकल्पाला पहिल्या दिवसापासूनच पाठिंबा दिल्याचेही ते म्हणाले.
नाणारसोबत मागच्या दाराने चर्चा सुरू- राणे
नाणार कंपनीसोबत शिवसेनेची मागच्या दाराने चर्चा सुरू आहे, असा गंभीर आरोपही नितेश राणे यांनी केला. आकडा फायनल होत नाही तोपर्यंत सेनेचा या प्रकल्पाला विरोध असेल आणि जेव्हा आकडा फिक्स होईल तेव्हा ते पाठिंबा प्रकल्पाला देतील, असेही ते पुढे म्हणाले. मातोश्री आणि स्थानिक जनतेचा आता काहीच संपर्क उरलेला नाही. मातोश्रीशी जनतेशी संवाद तुटला आहे आणि हे आपण कोविड काळात पाहिले , असल्याचे ते म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा-
शिवसेनेचे आमदार राजन साळवी हे गेल्या १५ वर्षांपासून आमदार आहेत. ते लोकांमध्ये फिरत असतात. त्यांनी लोकांचे मत काय आहे हे समजून घेऊनच पाठिंबा दिला आहे. हा प्रकल्प व्हावा असे स्थानिक शिवसैनिकांना वाटते. त्यामुळे शिवसेनेनेही स्थानिकांच्या भूमिकेचा आदर केला पाहिजे, असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वत:च्या नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे ऐकत नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times