सिंधुदूर्ग: बहुचर्चित उदघाटन पुन्हा रखडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. विमानतळाच्या इमारतीचे काम समाधानकारक असले तरी देखील विमानतळाच्या धावपट्टीच्या सरफेसचे काम मात्र समाधानकारक झाले नसल्याचा अहवाल केंद्राच्या नागरी उड्डाण महासंचालनालयाने () दिला आहे. हे पाहता विमानतळ उभारणीच्या निकषांचे तंतोतंप पालन न झाल्यास विमानतळ राज्याची एमआयडीसी ताब्यात घेईल असा शेवटचा इशारा आयआरबी सिंधुदुर्ग एअरपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला देण्यात आला असल्याचे शिवसेनेचे खासदार यांनी सांगितले आहे. जर आयआरबी कंपनीने डीजीसीआयचे निकष पाळले नाहीत तर हे विमानतळ कंपनीच्या हातातून काढून घेण्यात येईल, असे राऊत यांनी म्हटले आहे.

राज्य सरकारला विनंती की निकळ तंतोतंत पालन करत नसेल तर विमानतळाबाबचा करार रद्द करून तो विमानतळ ताब्यात घ्यावा अशी विनंती आपण राज्य सरकारला केली असल्याचेही राऊत म्हणाले.

चिपी विमानतळाची नुकतीच केंद्राच्या DGCA पथकाने पहाणी केली होती “या पथकात DGCA चे कमिटी सदस्य तथा खासदार राजू प्रताप रूडी तसेच संसदीय अंदाज समितीचे अध्यक्ष खासदार गिरीश बापट आणि खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय अधिकाऱ्यांसोबत विमानतळाची पहाणी केली होती. मात्र या समितीने चिपी विमानतळाचे इमारत काम समाधानकारक असले तरी विमानतळाच्या धावपट्टीच्या सरफेसचे काम समाधानकारक झाले नसल्याचा अहवाल दिला. त्यामुळे दिलेल्या अहवालात नियमाचे तंतोतंत पालन झाले नाही, तर चिपी एअरपोर्ट महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात घेण्याबाबत विचार सुरू झाला आहे.

क्लिक करा आणि वाचा-

या संदर्भात दिल्लीत ९ मार्चला विमान वाहतूक मंत्रालयाची बैठत होत असून या बेठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात येईल असे खासदार विनायक राऊत यांनी स्पष्ट केले.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here