ठाणे: अथक प्रयत्नांनंतरही शहरातील करोनाचा (Corona in ) संसर्ग कमी होण्याची चिन्हे दिसत नसून एकूण १६ ठिकाणी हॉटस्पॉट (Hotspots) जाहीर करण्यात आले आहेत. ठाण्यात करोनाचा संसर्ग वाढतच असून या १६ ठिकाणचा लॉकडाउन (Lockdown) ३१ मार्चपर्यंत वाढवण्यात आला आहे. या काळात नियमांची कडक अंमलबजावणी करण्यात यावी, असे आदेश ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी दिले आहेत. ( extended till march 31 at 16 places in thane)

तसे पाहता ठाणे शहरात करोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६ टक्के इतके आहे. मात्र असे असले तरी देखील येथील संसर्गावर अपेक्षप्रमाणे नियंत्रण मिळताना दिसत नाही. या मुळे प्रशासन अधिक सतर्क झाले असून शहरात धोका असलेल्या ठिकाणी नियमांची कडक अंमलबजावणी केली जात आहे.

ठाण्यातील १६ ठिकाणे ‘हॉटस्पॉट’

मुंबई आणि राज्यातील इतर शहरांप्रमाणेच ठाण्यातही करोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ठाण्यात करोनाचा संसर्ग असाच वाढत गेला तर संसर्गावर नियंत्रण मिळवणे कठीण होऊन बसेल. हे लक्षात घेत ठाण्यातील ज्या ठिकाणी करोनाचा फैलाव होत आहे किंवा अधिक धोका निर्माण होत आहे, अशी १६ ठिकाणे निश्चित करून ती प्रतिबंधित क्षेत्रे किंवा हॉटस्पॉट म्हणून घोषित करण्यात आली आहेत.

क्लिक करा आणि वाचा-

ही आहेत ठाण्यातील १६ हॉटस्पॉट्स

>> कळवा प्रभाग समिती क्षेत्रात विटावा, आईनगर, सुर्यनगर, खारेगाव परिसर

>> परिमंडळ दोनमध्ये चेंदणी कोळीवाडा, वागळे आणि श्रीनगर

>> परिमंडळ 3 मध्ये माजिवडा-मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रातील बाळकुम, लोढा, लोढा आमारा, हिरानंदानी इस्टेट, हिरानंदानी मेडोज गृहसंकुले

>> लोकमान्य-सावरकरनगर प्रभाग समिती क्षेत्रातील दोस्ती विहार, शिवाई नगर, कोरस टॉवर, कोलबाड, रुस्तुमजी.

क्लिक करा आणि वाचा-

औरंगाबाद जिल्ह्यात करोना बळी १२९६, तर ३,०५२ सक्रिय रुग्ण
औरंगाबाद जिल्ह्यातील चार, तर अहमदनगर जिल्ह्यातील एका बाधिताचा उपचारादरम्यान घाटीत मृत्यू झाल्यामुळे औरंगाबाद जिलह्यातील करोना बळींची संख्या १२९६ झाली आहे. त्याचवेळी जिल्ह्यात सोमवारी (८ मार्च) ३८८ नवे बाधित आढळून आल्याने एकूण बाधितांची संख्या ५३,३५७ झाली आहे. तसेच सोमवारी जिल्ह्यात ५५० बाधित (शहरः ५२४, ग्रामीणः २६) करोनामुक्त झाल्याने आतापर्यंत करोनामुक्त झालेल्यांची संख्या ४९,००९ झाली आहे व सध्या ३,०५२ बाधितांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

क्लिक करा आणि वाचा-

ग्रामीण भागात ३१ नवे बाधित

ग्रामीण भागातील नव्या बाधितांमध्ये लासूर स्टेशन येथील २, वाळूज २, रांजणगाव १, शिवना, सिल्लोड १, वडगाव को. १, बजाज नगर ५, सिडको महानगर-एक २ व इतर ठिकाणच्या १७ व्यक्तींचा समावेश आहे.

मृतांमध्ये चार पुरुष, एक महिला

शहरातील भगतसिंग नगर (हर्सूल) येथील ७६ वर्षीय पुरुष, शिवनेरी कॉलनी (एन-नऊ) येथील ६० वर्षीय पुरुष, बिलाल नगर (सिल्लोड) येथील ५८ वर्षीय पुरुष, तालखेडा (वैजापूर) येथील ६५ वर्षीय महिला, तर कोपरगाव टाकळी (जि. अहमदनगर) येथील ७५ वर्षीय पुरुष, या पाच बाधितांचा उपचारादरम्यान घाटीत मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील करोना बळींची संख्या १२९६ झाली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here