चहल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना हा इशारा दिला आहे. मुंबईत दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. काल मुंबईत एकूण २३ हजार कोविड चाचण्या करण्यात आल्या. या पूर्वी जानेवारी महिन्यात १० ते १२ हजार चाचण्या केल्या जात होत्या. चाचण्यांच्या संख्येमध्ये सतत वाढ होत आहे, असे चहल म्हणाले.
मुंबईत दर १०० चाचण्यांमध्ये ६ पॉझिटिव्ह
मुंबईत दर १०० चाचण्यांमागे ६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळत असल्याची माहिती आयुक्त चहल यांनी दिली. म्हणजेच मुंबईचा पॉझिटिव्ही रेट ६ टक्के इतका आहे. इतर शहरांचा पॉझिटीव्हिटी रेट मुंबईपेक्षा जास्त आहे. त्यामुळे अशा शहरांमध्ये लॉकडाऊनबाबत विचार होऊ शकतो. मात्र, मुंबईत ती स्थिती नसल्याने सध्या मुंबईत लॉकडाउन लावण्याची गरज वाटत नसल्याचे चहल म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा-
मुंबईत झपाट्याने वाढत जाणारी रुग्णसंख्या मध्यंतरीच्या काळात आटोक्यात येऊ लागली होती. मात्र ही संख्या आटोक्यात येत असताना पुन्हा रुग्णसंख्येत झापाट्याने वाढ होऊ लागली आहे. त्यानंतर आता मुंबईत लॉकडाउन लागू होणार अशी चर्चा सगळीकडे ऐकू येऊ लागली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील लोकांना नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले होते. अन्यथा लॉकडाउनचा विचार करावा लागेल, असा इशाराही त्यांनी जनतेला दिला होता.
क्लिक करा आणि वाचा-
मुंबईचे पालकमंत्री म्हणाले…
मुंबईत सध्या लॉकडाउनची आवश्यकता नसल्याचे चहल यांनी म्हटले असले तरी देखील मुंबईत अंशत: लॉकडाऊन केले जाऊ शकते, असे संकेत मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिले आहेत. प्रथम मुंबईतील नाइट क्लब बंद केले जातील. त्यानंतरही रुग्ण वाढत राहिल्यास नाइट कर्फ्यू किंवा अंशत: लॉकडाऊनची शक्यता नाकारता येत नाही, असंही शेख यांनी सांगितलं.
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times