नंदीग्राममधील घटनेनंतर ममता बॅनर्जी यांना कोलकात्यात हलवण्यात आलं आहे. कोलकात्यातील एसएसकेएम हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आलं आहे. ममता बॅनर्जींचा एमआरआय करण्यात येत आहे. त्या गंभीर दुखापत झाली असून पाय फ्रॅक्चर झाला आहे. आम्ही वैद्यकीच अहवालाच्या प्रतीक्षेत आहोत, असं ममता बॅनर्जी यांचे भाचे आणि तृणमूल काँग्रेसचे नेते अभिषेक बॅनर्जी यांनी सांगितलं.
दरम्यान, पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांनी एसएसकेएम हॉस्पिटलमध्ये जाऊन ममतांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसंच त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली. या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून माहिती घेत असल्याचं राज्यपाल धनखड म्हणाले.
पण प्रत्यक्षदर्शींनी सांगितली वेगळीच कहाणी
दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी आपल्यावर ४ ते ५ हल्ला जणांनी हल्ला केला. तसंच धक्काबुक्की केल्याचा आरोप केला आहे. पण घटनेच्या ठिकाणावरील प्रत्यक्षदर्शींनी मात्र वेगळीच कहाणी सांगितली. ममतादीदी सभेसाठी आल्या होत्या. त्यावेळी नागरिकांनी त्यांना बघण्यासाठी मोठी गर्दी केली होती. ममतादीदी निघत असताना या गर्दीमुळे काही लोक पडले. यावेळी ममतादीदींच्या गळ्याला आणि पायाला दुखापत झाली. पण त्यांना कुणीही धक्काबुक्की केली नाही आणि हल्लाही केला नाही. त्यावेळी गाडी अतिशय हळू चालत होती, असं प्रत्यक्षदर्शी सुमन मैती या तरुणाने सांगितलं.
नंदीग्रामच्या बिरूलीयामध्ये ममतादीदी आल्या त्यावेळी मी तिथे होतो. त्या गाडीत बसलेल्या होत्या. पण गाडीचं दार उघडं होतं. यावेळी एका पोस्टरचा गाडीच्या दाराला फटका बसला. यामुळे दार बंद झालं. गाडीचं दार कोणीही बंद केलं नाही. तसंच दाराजवळ कोणीही नव्हतं, असं प्रत्यक्षदर्शी चित्रनंजन दास यांनी सांगितलं.
ममता बॅनर्जी यावेळी नंदीग्राममधून निवडणूक लढवत आहेत. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी ८ टप्प्यांत मतदान होणार आहे. मतदानाचा पहिला टप्पा २७ मार्चला होईल. तर २९ एप्रिलला मतदानाचा अखेरचा टप्पा आहे. निकाल २ मे रोजी लागणार आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times