नवी दिल्लीः पश्चिम बंगालच्या नंदीग्राममध्ये आपल्यावर हल्ला झाल्याचा आरोप स्वतः मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी केला. आपल्या गाडीजवळ ४ ते ५ जण आले आणि त्यांनी दरवाजा बंद केल्याने आपल्या जोरदार मार लागला, असं म्हणाल्या. हे वृत्त येताच सोशल मीडियावर गरमा गरम चर्चा सुरू झाली. सोशल मीडियावर (Prashant Kishore), ममता बॅनर्जी () आणि हॅशटॅग नौटंकी #Nautanki ट्रेंडवर होते.

दरम्यान, ममतांचा एमआरआय करण्यात आला. यात त्यांच्या डाव्या पायाच्या घोट्याला, पायाला दुखापत झाली आहे. तसंच त्यांच्या उजव्या खांद्याला, हाताच्या कोपराला आणि मानेजवळही दुखापत झाली आहे. त्यांना छातीत दुखत आहे आणि श्वास घेण्यासही त्रास होतोय. त्यांना ४८ तास देखरेखी खाली ठेवण्यात येत आहे, अशी माहिती एसएसकेएम हॉस्पिटलचे डॉक्टर एम. बंडोपाध्याय यांनी सांगितलं.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचे रणनीतीकार प्रशांत किशोर हे ट्वीटरवर ट्रेंडवर होतो. युजर्स वेगवेगळे ट्वीट करत होते. ममता बॅनर्जींसोबत जे काही घडले ते सर्व नियोजित होते आणि निवडणूक जिंकण्यासाठी प्रशांत किशोर हे सर्व डावपेच खेळत आहेत, असं युजर्स म्हणत होते.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासोबतही असंच झालं होतं. केजरीवाल यांनी हनुमान चालीसा म्हटली आणि नंतर त्यांच्यावर हल्ला झाला होता, असं एका युजर्सने म्हटलंय.

तर प्रशांत किशोर हे या वर्षाचे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि ममता बॅनर्जी या सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरल्या आहेत, अशी टीका केली गेली.

यासह ट्वीटरवर हॅशटॅग नौटंकी ही ट्रेंड करत होते. मुख्यमंत्री ममतांनी आपल्यावरील या हल्ल्याचा आरोप भाजपवर केला आहे. आपल्याविरोधात कट रचून हल्ला केला गेला, असा आरोप ममतांनी केला. तर पश्चिम बंगाल भाजपचे प्रभारी कैलास विजयवर्गीय यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे. ममतादीदींच्या जवळही कोणी जाऊ शकत नाही. तरीही संशय असेल तर सीबीआय चौकशी करावी. ममतांचे हे नाटक आहे, असं कैलास विजयवर्गीय आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here