मुंबई: करोना वाढत्या रुग्णसंख्येमुळं काही शहरांमध्ये निर्बंध लादले जात असताना मुख्यमंत्री यांनी मोठी बातमी दिली आहे. राज्यात काही ठिकाणी नाईलाजाने करावा लागेल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. पुढच्या एक-दोन दिवसांत याबाबत निर्णय घेतला जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

राज्यभरात करोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. काही दिवसांपूर्वी १० हजारच्या आत असलेल्या रुग्णसंख्येनं बुधवारी थेट १३ हजारांचा टप्पा ओलांडला. त्यामुळं चिंता वाढली आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी याच पार्श्वभूमीवर कठोर निर्णय घेण्याचे संकेत दिले आहेत. मुंबईतील जे जे रुग्णालयात करोनाची लस घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ‘लसीकरणाचा वेग वाढवण्याचा आपला प्रयत्न आहे, पण कदाचित काही दिवसांत काही ठिकाणी लॉकडाऊन करावा लागेल. एक दोन दिवसांत आम्ही याबाबत निर्णय घेणार आहोत. जिथं करोनाचा प्रादूर्भाव अधिक आहे, तिथं लॉकडाऊनचे पाऊल उचलावेच लागेल, असं ते म्हणाले.

‘लस घेण्यासाठी जे पात्र आहेत, त्या सर्व नागरिकांनी लसीकरण करून घ्यावं. सार्वजनिक ठिकाणी अनावश्यक फिरणं टाळा आणि मास्कचा वापर करा, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळा, असं आवाहनही त्यांनी केलं. कदाचित आपल्याला पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करावी लागेल. अजूनही परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाही. ती जाऊ नये असं वाटत असेल तर ही बंधनं पाळावी लागतील. कोविड लस टोचून घेताना काहीच कळत नाही. लसीबाबत कोणत्याही प्रकारची भीती किंवा संभ्रम बाळगण्याचे कारण नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here