वाचा:
राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असल्याचे दिसत आहे. गेले काही दिवस सातत्याने रुग्णसंख्येत मोठी वाढ होत असून आज १५ हजारांचा टप्पा ओलांडला गेल्याने चिंतेत भर पडली आहे. आजही पुणे, आणि या तीन शहरांत करोनाची सर्वाधिक रुग्णवाढ झाली असून यापैकी नागपूर शहरात १५ ते २१ मार्चपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे तर आणि मुंबईत करोनाचे निर्बंध काटेकोरपणे पाळले जावेत यासाठी पावले उचलण्यात आली आहेत.
वाचा:
राज्याची करोनाची आजची आकडेवारी आरोग्य विभागाने दिली असून करोनाचा वाढता आलेख प्रशासनापुढे आव्हान उभे करणारा आहे. राज्यात आज ५६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून आतापर्यंत ५२ हजार ७२३ इतके रुग्ण करोना संसर्गाच्या विळख्यात सापडून दगावले आहेत. सध्या राज्यातील २.३१ टक्के एवढा आहे. गेल्या २४ तासांत राज्यात १५ हजार ८१७ नवीन रुग्णांचे निदान झाले असून ११ हजार ३४४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण २१ लाख १७ हजार ७४४ करोना बाधित रुग्णांनी करोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) सध्या ९२.७९ टक्के एवढे आहे. आतापर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ७३ लाख १० हजार ५८६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २२ लाख ८२ हजार १९१ (१३.१८ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख ४२ हजार ६९३ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत तर ४ हजार ८८४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
वाचा:
राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख १० हजार ४८५ इतकी झाली आहे. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक २१ हजार ७८८ रुग्ण आहेत तर नागपूर जिल्ह्यातील आकडा वाढून १५ हजार ११ इतका झाला आहे. मुंबई पालिका हद्दीत हा आकडा ११ हजार ८३ इतका आहे तर ठाणे जिल्ह्यात सध्या ११ हजार ४२२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यात पुणे पालिका हद्दीत आज १८४५, नागपूर पालिका हद्दीत १७२९, मुंबई पालिका हद्दीत १६४७ नवीन रुग्ण आढळले.
ठाणे जिल्ह्यात ११५३ नवे रुग्ण
ठाणे जिल्ह्यात करोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून आज १ हजार १५३ नवीन रुग्ण आढळले आहेत. यापैकी कल्याण-डोंबिवलीमध्ये ४१६, ठाणे २९६, नवी मुंबई २१६, मिरा-भाईंदर ७४, बदलापूर ५२, अंबरनाथ ३८, उल्हासनगर २७, भिवंडी २५, आणि ठाणे ग्रामीणमध्ये १० नवीन रुग्णांची वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने जिल्ह्यातील बाधितांची संख्या २ लाख ७४ हजार २८३ इतकी झाली आहे. तर दिवसभरात ६४२ रुग्ण बरे झाल्यानंतर आतापर्यंत करोनामुक्त रुग्णांची संख्या २ लाख ५९ हजार ३६० वर पोहचली आहे. सध्या ८ हजार ५९७ रुग्ण उपचार घेत आहेत. तर, पाच रुग्णांचा मृत्यू झाला असून करोनाबळींचा आकडा देखील वाढत ६ हजार ३२६ वर गेला आहे.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times