अहमदनगर: कधी विकास कामासाठी एकत्र येत असल्याचे सांगायचे. कधी निवडणुकीत एकमेकांना पूरक भूमिका घ्यायच्या तर कधी एकमेकांवर आरोप करायचे. असे प्रकार कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार आणि नगरचे भाजपचे खासदार डॉ. यांच्यात सुरू आहेत. अलीकडेच जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी एकमत झालेले दिसून आले असताना आता त्याच संचालकाच्या सत्काराच्या वेळी विखे यांनी पवारांवर श्रेयवादाचा आरोप केला. त्यामुळे या दोघांमध्ये नेमकं चालंलय काय? असा प्रश्न लोकांमधून उपस्थित होत आहे.

वाचा:

विधानसभा निवडणुकीच्या आधीपासून या दोघांनी संधी मिळेल तेव्हा दोघांत मैत्री असल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न केला. पवार-विखे कुटुंबातील दोन पिढ्यांचे राजकीय वैर तिसरी पिढी संपविणार असेही वातावरण निर्माण झाले होते. अधूनमधून एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्ताने दोघे विकासाच्या मुद्द्यावर एकत्र असल्याचे सांगण्यात येत. कर्जतमधील रस्ता रुंदीकरण आणि त्यासाठी अतिक्रमणे हटविण्याचा प्रश्न गंभीर बनला तेव्हाही आपण राजकारण न करता एकत्रित निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात आले होते. या सहमती एक्स्प्रेसची मतदारसंघात जोरदार चर्चाही सुरू झाली होती. अलीकडेच झालेल्या जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत जामखेडमध्ये ही सहमती दिसून आली. तेथे विखेंच्या उमेदवारासाठी राष्ट्रवादीच्या उमेदवाराने माघार घेतली. मात्र, पुढे जिल्हा बँकेची राजकारण फिरले आणि त्यात विखे एकाकी पडल्याचे दिसून आले. त्यानंतर पुन्हा विखेंचा सूर बदल्याचे दिसून आले.

वाचा:

जामखेडमध्ये जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात यांचा सत्कार आणि कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्यामध्ये बोलताना खासदार डॉ. विखे यांनी आमदार पवारांवर आरोप केला. ते म्हणाले, ‘आमदार रोहित पवार भाजपने केलेल्या कामाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत आहेत. कर्जत-जामखेडचा खरा विकास माजी मंत्री राम शिंदे यांनीच केला आहे, हे येथील जनतेला चांगलेच ठावूक आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात फुकटचे श्रेय घेणाऱ्याना जनता त्यांची जागा दाखवून देईल. काही दिवसांपूर्वी न्हावरा फाटा ते जामखेड हा रस्ता आम्ही पाठपुरावा करून केला आहे, परंतु याचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न आमदार पवार करत आहेत. गेल्या पाच वर्षात शेतकऱ्यांना विनासायास वीज पुरवठा पूर्ण दाबाने व अखंडित सुरु ठेवला होता. परंतु राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून पूर्ण दाबाने वीज पुरवठा होत नाही. बिले भरली नाहीत म्हणून राज्य सरकारने वीज तोडण्याचे आदेश दिले आहेत. अशा पद्धतीने हे सरकार शेतकऱ्यांना मानसिक व आर्थिकदृष्ट्या त्रास देत आहे,’ असा आरोपही विखे यांनी केला.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here