मुंबई: भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष (Chandrakant Patil) यांनी प्रकरणावरून () (Cm Uddhav Thackeray) यांना आपल्या टीकेचे लक्ष केले आहे. एनआयएने (NIA) दहशतवादी कटात अटक केलेल्या पोलिस अधिकाऱ्याला कालपर्यंत राज्याचे मुख्यमंत्री पाठीशी घालत होते, ही अतिशय लाजिरवाणी बाब आहे. एका कलंकित अधिकाऱ्याला पाठीशी घालून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची आणि राज्याची प्रतिष्ठा धुळीस मिळवली, अशी घणाघाती टीका चंद्रकांत पाटील यांनी केली. ( criticizes )

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिक सचिन वाझे यांचा बचाव का केला? हे समजण्यापलीकडचे आहे. आपल्या लोकशाही व्यवस्थेत कोणताही राजकीय पक्ष प्रथम आपल्या संविधानाशी निष्ठा बाळगतो आणि नंतर जनतेचा पाठिंबा मिळवतो, परंतु येथे उद्योगपतींच्या घातपाताची व समाजातील शांतता भंग करणाऱ्यांचे शिवसेना समर्थन करत होती, अशी टीकाही चंद्रकांतदादा पाटील यांनी केली.

मनसुख हिरन यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नीने अनेक प्रश्न उपस्थित केले होते. त्या प्रश्नांची उत्तरे महाराष्ट्राची जनताही शोधत आहे. वाझे यांचे समर्थन का केले जात होते? असा सवाल करतानाच चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, नक्की कोणते मंत्री, आमदार आणि राजकीय नेत्यांना या संपूर्ण घटनेची कल्पना होती आणि तरीही त्यांनी मौन बाळगले?

क्लिक करा आणि वाचा-

हे केवळ हत्येचे प्रकरण नाही, तर हा देशाच्या आर्थिक राजधानीमध्ये दहशतवादी हल्ल्याचा कट होता. ज्यामध्ये एक पोलीस अधिकारी संशयास्पदरित्या सहभागी होता. पण जनतेला महाराष्ट्र पोलिस, मुंबई पोलिस आणि एनआयएवर पूर्ण विश्वास आहे आणि ते याप्रकरणाचा तपास करुन खऱ्या सूत्रधाराला अटक करुन या प्रकरणाचा लवकरच पर्दाफाश करतील, अशी आशा चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केली.

क्लिक करा आणि वाचा-

पाटील पुढे म्हणाले की, काही पोलिस अधिकाऱ्यांनी दहशतवादी कट रचणाऱ्यांना किंवा खुनाच्या घटनांमध्ये संशयित आरोपींचे रक्षण करण्यापेक्षा विशेषत: महिलांवरील गुन्हेगारी कमी करण्यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.

क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here