फडणवीस पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यांना पुन्हा सेवेत घेण्यासाठी शिवसेनेत्या काही नेत्यांनी माझ्याकडे आग्रह धरल्यानंतर मी त्याबाबत अॅडव्होकेट जनरल यांचे मत मागवले. त्यावेळी वाझे यांना सेवेत घेऊ नये असा सल्ला त्यांनी मला दिला होता. वाझे यांना उच्च न्यायालयाने निलंबित केले असल्याने त्यांना सेवेत घेताच येणार नाही, असे ते म्हणाले होते. असे केल्यास कोर्टाच्या आदेशाचा अवमान होईल, असे ही अॅडव्होकेट जनरल यांनी मला सांगितल्याचे फडणवीस म्हणाले.
राज्यात पुढे सत्ताबदल झाल्यानंतर करोनाचे कारण सांगत ठाकरे सरकारने वाझेंना पुन्हा सेवेत घेतले. काही निवृत्त अधिकारी करोना संकटकाळात सेवेत हवे असल्याचे त्यावेळी सरकारने म्हटल्याचे फडणवीस म्हणाले.
अँटिलिया स्फोटके प्रकरणातील ज्या काही गोष्टी बाहेर आल्या आणि त्यानंतर ज्या प्रमाणे सचिन वाझे यांना अटक करण्यात आली, यावरून सरकारवर प्रश्नचिन्ह लागले असल्याचे फडणवीस म्हणाले. ही घटना अतिशय गंभीर आहे आणि म्हणून सचिन वाझे यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असे आम्ही सतत म्हणत आलो आहोत. मात्र, त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देखमुख हे जणूकाही त्यांचे वकील असल्याप्रमाणे त्यांचा बचाव करत होते, अशी टीका फडणवीस यांनी केली आहे.
क्लिक करा आणि वाचा-
या प्रकणात अजूनही अतिशय कमी गोष्टी उघड झाल्या आहेत. मात्र या प्रकरणातील मनसुख हिरन यांची हत्या हा अँगल अतिशय गंभीर आहे, असे मला वाटत असल्याचे फडणवीस म्हणाले. या प्रकरणातील जेव्हा सर्व गोष्टी बाहेर येतील तेव्हा या प्रकणाशी कोणाकोणाचा संबंध आहे हे बाहेर येईल. शिवाय हे प्रकरण घडवण्यामागचा उद्देश काय आहे, हे देखील स्पष्ट होईल, असे फडणवीस म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा-
केवळ वाझे यांना सेवेतच घेतले गेले नाही, तर पोलिस दलाचा अत्यंत महत्वाचा भाग असलेल्या क्राइम इंटेलिजन्स युनिट या विभागाचे त्यांना प्रमुख बनवण्यात आले. या विभागाचा प्रमख पीआय असतो. त्याला हटवून त्या जागी वाझेंना बसवण्यात आले. त्यांच्याकडे महत्वाची प्रकरणे सोपवली गेली. १६ वर्षे निलंबित असलेल्या वाझेंना शिवसेनेने हे पद दिले, असे फडणवीस म्हणाले. वाझे हे निलंबनाच्या काळात शिवसेनेत होते. ते शिवसेनेचे प्रवक्ते देखील होते. त्यांना महत्वाची प्रकरणे का दिली हे मला माहीत नाही, असेही फडणवीस पुढे म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा-
आपल्या स्वार्थासाठी असे करणे अतिशय अयोग्य आहे. यामुळे पोलिस आणि सरकारची प्रतिमा मलीन होते. हे प्रकरण अर्धेच बाहेर आले आहे आणि अपेक्षा अशी आहे की आता संपूर्ण सत्य बाहेर येईल असेही फडणवीस म्हणाले.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times