आज राज्यात एकूण ५० करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ही संख्या काल ८८ इतकी होती. सध्या राज्यातील मृत्यूदर २.२८ टक्के इतका आहे. राज्यात आज ८ हजार ८६१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत एकूण २१ लाख ३४ हजार ०७२ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.२१ टक्के इतके झाले आहे.
आतापर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ७५ लाख १६ हजार ८८५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २३ लाख १४ हजार ४१३ (१३.२१ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख ८३ हजार ७१३ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत तर ५ हजार ४९३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
क्लिक करा आणि वाचा-
राज्यात सक्रिय रुग्णांचा आकडा वाढला
राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख २६ हजार २३१ इतकी झाली आहे. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक २५ हजार ६७३ इतरे रुग्ण आहेत तर नागपूर जिल्ह्यातील आकडा वाढून तो १६ हजार ९६४ इतका झाला आहे. मुंबई पालिका हद्दीत हा आकडा १२ हजार ५३५ इतका आहे. तर ठाणे जिल्ह्यात सध्या १२ हजार ३३२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
क्लिक करा आणि वाचा-
या बरोबरच नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ७ हजार ६८८ इतकी आहे. अमरावतीत ही संख्या ३ हजार ९९७, औरंगाबादमध्ये ७ हजार १४८, जळगावमध्ये ४ हजार ९४४, अहमदनगरमध्ये २ हजार ३२८ इतकी आहे. तर, कोल्हापुरात सक्रिय रुग्णांची संख्या ४०१ इतकी आहे. राज्यात सर्वात जास्त सक्रिय रुग्णांची संख्या पुण्यात आहे. तर, सर्वात कमी सक्रिय रुग्णांची संख्या गडचिरोली जिल्ह्यात आहे. येथे सक्रिय रुग्णांची संख्या २२० इतकी आहे.
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times