म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबईत फेब्रुवारीच्या अखेरीपासून करोना रुग्णसंख्या पुन्हा वाढत असल्याने मुंबईकर आणि पालिकेसमोर नवनवीन आव्हाने उभी राहिली आहेत. गेले वर्षभर करोनाशी लढा देताना राज्य सरकार आणि पालिका प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबवण्यात आल्या. त्यातून करोनास प्रतिबंध करण्यात यश येत असल्याचे जाणवत असतानाच अचानक रुग्णसंख्या वाढू लागली. सध्या मुंबईत दैनंदिन स्तरावर करोना रुग्णसंख्या १,५०० ते १,६०० पर्यंत जात असल्याने पालिका यंत्रणांवरील ताण वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एका संपूर्ण वर्षात पालिकेने करोना नियंत्रणासाठी १,६०० कोटी रुपये खर्च केले आहेत. या खर्चात आता आणखी वाढ होऊ शकते, असा कयास आहे.

वाचा:

मुंबईत गेल्या वर्षी मार्चमध्ये करोनाचा पहिला रुग्ण आढळला आणि त्यानंतर हा संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरला. गतवर्षी साधारण जून ते सप्टेंबरपर्यंत रुग्णसंख्या प्रचंड वाढली होती. त्यानंतर त्यास उतार येत गेल्याने यंत्रणेसह मुंबईकरही सुटकेचा श्वास टाकत होते. मात्र, फेब्रुवारीनंतर त्यात वाढ होत गेल्याने चिंतेचे वातावरण आहे. पालिकेने जंबो करोनाकेंद्र सज्ज ठेवणे, चाचण्या, उपचार, खाटांची संख्या वाढविणे, आयसीयू, व्हेंटिलेटर, तपासणी आदी विविध मार्गांनी उपाययोजना हाती घेतल्या आहेत. त्यासाठी पालिकेच्या गंगाजळीतील १,६०० कोटी रुपयांची रक्कम आजवर खर्च झाली आहे. त्यातील अनेक तरतुदींवरील खर्चांबाबत प्रशासनाने हिशेब दिलेला नसल्याचा आक्षेप वारंवार विरोधी पक्षांकडून घेतला जात आहे.

वाचा:

करोना प्रतिबंधासाठी दैनंदिन चाचण्यांवर भर दिला जात आहे. पालिकेकडून करण्यात आलेल्या करोना चाचण्यांची संख्या ३५ लाखांपर्यंत गेली आहे. त्यातून, ३,४१,९८५ जणांना करोना संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. तर, मुंबईच्या एकूण लोकसंख्येच्या ३६ टक्के मुंबईकरांना विलगीकरणात जाण्यावाचून पर्याय नव्हता. करोना झालेल्या मुंबईकरांची संख्या अडीच टक्के आहे. या संपूर्ण घटनाक्रमाचा आढावा घेतल्यास मुंबईकरांना करोना संसर्गास रोखण्यासाठी आणखी सतर्क राहण्याची वेळ आली आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here