आज राज्यात एकूण ८७ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल ही संख्या ४८ इतकी होती. सध्या राज्यातील मृत्यूदर २.२६ टक्के इतका आहे. राज्यात आज ९ हजार ५१० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत एकूण २१ लाख ५४ हजार २५३ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१.७७ टक्के इतके झाले आहे.
राज्यात सक्रिय रुग्णांचा आकडा वाढतो आहे
राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख ३८ हजार ८१३ इतकी झाली आहे. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक २८ हजार ८१७ इतरे रुग्ण आहेत तर नागपूर जिल्ह्यातील आकडा वाढून तो १९ हजार ५५८ इतका झाला आहे. मुंबई पालिका हद्दीत हा आकडा १३ हजार ८६२ इतका आहे. तर ठाणे जिल्ह्यात सध्या १३ हजार १५० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
क्लिक करा आणि वाचा-
या बरोबरच नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ८ हजार ६७७ इतकी आहे. अमरावतीत ही संख्या ३ हजार ७४३, औरंगाबादमध्ये ८ हजार ८७७, जळगावमध्ये ४ हजार ८४८, अहमदनगरमध्ये २ हजार ४७२ इतकी आहे. तर, कोल्हापुरात सक्रिय रुग्णांची संख्या ४०३ इतकी आहे. राज्यात सर्वात जास्त सक्रिय रुग्णांची संख्या पुण्यात आहे. तर, सर्वात कमी सक्रिय रुग्णांची संख्या गडचिरोली जिल्ह्यात आहे. येथे सक्रिय रुग्णांची संख्या २३१ इतकी आहे.
क्लिक करा आणि वाचा-
साडे सहा लाखांवर व्यक्ती होम क्वारंटाइन
आतापर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ७७ लाख १५ हजार ५२२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २३ लाख ४७ हजार ३२८ (१३.२५ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६ लाख ५२ हजार ५३१ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत तर ६ हजार ०६७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times