नांदेड: देशात आणि परदेशात राजस्थानातील जयपूर () ही पिंक सिटी म्हणून प्रसिद्ध आहे. पर्यटकांचे ते आकर्षणाचे ठिकाण देखील आहे. आता गुलाबी शहराच्या () पक्तीला एक गुलाबी गावही (Pink VIllage) बसणार आहे. हे गुलाबी गाव साकारतंय नांदेड जिल्ह्यात. गुलाबी रंग हा स्त्रीत्वाच्या सबलीकरनाचा धैर्याचा रंग म्हणून ओळखला जातो. गावातील स्त्रियांना उभारी देण्यासाठी व त्यांचे सबलीकरण व्हावे यासाठी नांदेड जिल्ह्यातील या गावाने आता पुढाकार घेतलाय. त्यामुळे आता नांदेड जिल्ह्यातील हे गाव म्हणून राज्याच्या नकाशावर उभारी घेऊ पाहतेय. (The village of in Nanded district is coming into shape as the )

हदगाव तालुक्यातील हे गाव ‘माझे गाव सुंदर गाव’ या महाराष्ट्र शासनाच्या अभियानांतर्गत गुलाबी रंगाने नटलंय. त्यामुळे साप्ती आता पिंक व्हिलेज म्हणून महाराष्ट्रभर ओळखले जाईल.

हदगाव तालुक्यातील पैनगंगा नदीकाठचे मराठवाडयातील शेवटचे गांव साप्ती. प्रशासन सध्या कोरोना संकटाशी मुकाबला करीत आहे. दिवसागणिक रुग्णाची संख्या वाढत आहे आणि इकडे साप्ती गांवच्या विकासासाठी गांवकरी दिवस रात्र झटत आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीतील जय-पराजय, हेवेदावे विसरून थेट सरपंचापासून ते ग्रामसेवक, आजी-माजी पदाधिकारी, माजी सरपंच, उपसरपंच, आबालवृद्ध सगळेच गावासाठी झटत आहेत.

क्लिक करा आणि वाचा-
गावात शुद्ध पेयजल, शौचालय, रस्ते, वीज, शिक्षण, पांदनरस्ते, गांडूळखत निर्मिती, वृक्षारोपण, स्मशानभूमी सुशोभीकरण अशा कामांच्या माध्यमातून हे गाव विकासाची घोडदौड करत आहे.

क्लिक करा आणि वाचा-क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here