भारताची वाटचाल करोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेच्या दिशेने
देशात करोनाचे रोज मोठ्यासंख्येने नवीन रुग्ण आढळून येत आहेत. ही अतिशय चिंतेची बाब आहे. आपली वाटचाल ही करोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेच्या दिशेने होत असल्याचे हे संकेत आहेत. आता आपल्याला ठरवायंच आहे, कुठल्या दिशेने जायचं आहे. आक्रमकता दाखवून संसर्ग रोखायचा आहे की प्रादुर्भाव नियंत्रणाबाहेर जाऊ द्यायचा आहे, याचा विचार करण्याची ही वेळ आहे, असं गुलेरिया म्हणाले.
नियमांचं कठोर पालन करण्याची गरज
देशातील स्थिती अद्याप नियंत्रणात आहे. आपल्याला गेल्या वर्षीचा कित्ता पुन्हा गिरवायचा आहे. गेल्या वर्षी आपण जो धडा शिकलो तो आता पुन्हा लक्षात घ्यायला हवा. करोनाच्या नियमांचे कठोरपणे पालन होणं गरजेचं आहे. टेस्टींग, ट्रॅकिंग आणि आयसोलेशनवर भर देण्याची गरज आहे. अधिकाधिक टेस्टींग करावी लागेल. इतरांना संसर्ग होऊ नये यासाठी पॉझिटिव्ह असणाऱ्यांना आयसोलेट करावं लागेल, असं त्यांनी सांगितलं.
आपल्याकडे करोनाविरोधात लसीचे मोठे शस्त्र आहे. जोखीम असलेल्या नागरिकांना आधी लस दिली गेली पाहिजे. यामुळे मृतांची संख्या कमी होऊ शकते. तसंच आपल्याला एका दिवसांत कमीत कमी ५० लाख डोस देण्याची आवश्यकता आहे. लसीकरणाबाबत जनजागृतीची गरज आहे. खासकरून ग्रामीण भागात हे जागृतीचे अभियान राबवले गेले पाहिजे. यामुळे ग्रामीण भागात लसीबाबतचे संभ्रम दूर होतील. तसंच लसीकरण केंद्रावर येण्या-जाण्यासाठी वृद्धांसाठी वाहतुकीची सुविधा दिली गेली पाहिजे, असं मत त्यांनी व्यक्त केलं.
लसीकरणाचा हेतू जीव वाचवणं आणि मृत्यू रोखण्याचा आहे. आपल्याकडे पुरेशा प्रमाणात लस आहे. ३० कोटी जनतेसाठी ६० कोटी डोसची गरज आहे. आणि एका दिवसात कमीत कमी ५० लाख नागरिकांचे लसीकरण होण्याची आवश्यकता आहे, असं डॉ. गुरेरिया म्हणाले. सध्या एका दिवसात ३० लाख नागरिकांना लस देण्याचा विक्रम आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times