अमरावती/ धारणी: गेल्या दोन दिवसांपासून मेळघाटात तयार झालेले ढगाळ वातावरण आणि आज आकाशात मेघ दाटून बरसलेल्या पावसामुळे बळीराजा पुन्हा आस्मानी संकटात सापडला आहे. कर्ज काढून, तसेच उसनवारी करून शेतात पेरलेल्या रब्बी पिकांवर वादळी पावसाने अवकृपा केल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आज दुपारनंतर वादळी वाऱ्यासह बरसलेल्या पावसातून कापणीसाठी तयार झालेल्या गहू, हरभऱ्यासह इतर अनेत पीकांची नासाडी झाली आहे. याबरोबर उन्हाळी पिके म्हणून शेतात पेरलेल्या मका, मूग आणि भुईमुगाची पेरणी देखील संकटात सापडली आहे. ( have caused )

आज गुरुवारी मेळघाटात पावसाच्या सरी कोसळल्या. तर काही ठिकाणी विजाही कोसळल्या. जंगल, अभयारण्यातून धो-धो पाऊस बरसला. धारणी आणि चिखलदऱ्याच्या अतिदुर्गम भागात आदिवासी शेतकऱ्यांकडून मोठी मशागत केल्यानंतर पठारावर पेरलेली पीके या वादळी पावसामुळे नेस्तनाबूत झाली आहेत.

बैरागड, रंगुबेली, कूटंगा, चौराकूंड, रायपूर, हतरु, रुईपठार, ऐकताई, बीबा, जारीदा, काटकूंभ, चूर्णी, घंटाग, टेब्रूसोडा, जामली, कालापांढरी, चिखली, हरिसाल, ढाकणा, बिजूधावडी, सुसर्दा, राणीगाव, सावलीखेडा, साद्राबाडी, कळमखार सारख्या महसूल मंडळांतर्गत वसलेल्या शेकडो खेड्यापाड्यात या वादळी पावसाने कहर केला आहे. या भागातील गहू ,हरभरा आणि उन्हाळी मूग आणि उन्हाळी मका नष्ट झाला.

क्लिक करा आणि वाचा-

त्याच प्रमाणे बहरलेला आंब्याचा मोहोर देखील पावसाच्या माऱ्यामुळे गळून गेला आहे. आजच्या अवकाळी पावसामुळे बळीराजाच्या पिकांचे मोठे नुकसान झाल्याने येथील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here