आळंदी: ‘विठ्ठलाच्या, माऊलीच्या आणि तुकोबांच्या दर्शनासाठी कुणाच्या परवानगीची गरज नाही. तसं कुणाला वाटत असेल आणि कुणी परवानगी नाकारण्याची भाषा करत असेल तर त्याला वारकरी संप्रदायाचा विचार समजलाच नाही. तो सच्चा वारकरीच नाही,’ असा सणसणीत टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांनी आज वारकरी परिषदेला हाणला.

वाचा:

आळंदीतील जोग महाराज पुण्यतिथी सोहळ्यात उपस्थितांना संबोधित करताना पवार बोलत होते. ‘शरद पवार हे हिंदूविरोधी आहेत. ते नेहमीच हिंदू धर्माला विरोध करतात. रामायणाला विरोध करतात. नास्तिक मंडळींना पाठिंबा देतात. त्यामुळं त्यांना वारकऱ्यांच्या कुठल्याही कार्यक्रमाला बोलावू नका, असं आवाहन वारकरी परिषदेनं केलं होतं. वारकरी परिषदेचे वक्ते महाराजांनी त्याबाबतचं पत्रक प्रसिद्ध केलं होतं. या पार्श्वभूमीवर झालेल्या आजच्या सोहळ्यात पवार काय बोलतात याकडं सर्वांचंच लक्ष लागलं होतं.

पवारांनी आपल्या खास शैलीत वारकरी परिषदेचा समाचार घेतला. ‘विठ्ठलाला भेटायला पंढरीला जायचं असतं. माऊलीच्या दर्शनाला आळंदीला जायचं असतं आणि तुकोबांसाठी देहूला जायचं असतं. तिथं जायला परवानगी नाही असं कुणी सांगत असेल तर त्यांना वारकरी संप्रदायाचा विचारच समजला नाही. असा विचार करणारा सच्चा वारकरी नाही, असं मला वाटतं. पण अशा गोष्टी होत असतात. लहानसहान गोष्टींकडं दुर्लक्ष करायचं असतं,’ असा चिमटाही पवारांनी काढला.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here