मुंबई: अंबानी यांच्या घरासमोर सापडलेली स्फोटके आणि त्यानंतर राज्यात घडलेल्या घडामोडी यावरुन भाजपनं राज्य सरकारला धारेवर धरलं आहे. सचिन वाझे यांना अटक केल्यानंतर राज्यातील पोलीस दलात फेरबदल करण्यात आले आहेत. यावरुनच राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. तर, एकीकडे भाजपचे नेते यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याही राजीनाम्याची मागणी केली आहे. आता तर त्यांनी या सर्व प्रकरणांवरुन केंद्रीय गृहमंत्री यांना एक पत्र लिहलं आहे.

सचिन वाझे यांचा पूर्वेतिहास पाहता त्यांना पोलीस खात्यात परत घेणे तसेच मनसुख हिरन व अन्य हत्या, या सर्वाला राज्याचे मुख्यमंत्री जबाबदार असून नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामा द्यायला हवा, अशी मागणी यापूर्वी नारायण राणे यांनी केली होती. त्यानंतर आता पुन्हा राणेंनी गृहमंत्री अमित शहांना पत्र लिहलं आहे.

‘महाराष्ट्र सरकार योग्यरित्या काम करत नाही. सर्व काही अधिकाऱ्यांच्या इच्छेनुसार केले जाते. मुकेश अंबानी यांच्यासारख्या मोठ्या व्यक्ती मुंबईत असुरक्षित आहेत. तसंच, राज्यातील भ्रष्टाचार आणि कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती कमकुवत झाली आहे. त्यामुळं मुख्यमंत्र्यांचा राजीनामा आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहलं आहे,’ असं नारायण राणेंनी म्हटलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here