अहमदाबाद, : इंग्लंडच्या संघाला चौथ्या ट्वेन्टी-२० सामन्यात अखेरच्या षटकात पराभव झाला. इंग्लंडला या सामन्यात पराभवाचा धक्का बसला. पण या सामन्यानंतर इंग्लंडच्या संघाला अजून एक धक्का बसला आहे.

चौथ्या सामन्यात इंग्लंडच्या संघाने निर्धारीत वेळेत आपली २० षटके पूर्ण केली नाहीत आणि त्यामुळेच त्यांच्यावर आयसीसीने कारवाई केली आहे. इंग्लंडच्या संघाने संथगतीने गोलंदाजी केल्यामुळे त्यांच्यावर मानधनाच्या २० टक्के दंड करण्यात येणार आहे. त्याचबरोबर आयसीसीने या चुकीबद्दल इंग्लंडचा कर्णधार इऑन मॉर्गनला विचारणा केली होती. मॉर्गनने यावेळी आपली चुक असल्याचे मान्य केले आहे. मॉर्गनने आपली चुक मान्य केल्यावर आयसीसीने इंग्लंडच्या संघावर दंडात्मक कारवाई केली आहे.

गुरुवारी झालेल्या चौथ्या ट्वेन्टी-२० सामन्यात भारताने इंग्लंडवर विजय मिळवला. भारताने यावेळी अखेरच्या षटकात आठ धावांनी हा विजय साकारला होता. या विजयासह भारताने मालिकेत २-२ अशी बरोबरी केली आहे. त्यामुळे आता पाचवा सामना जो जिंकेल तोच मालिकेत बाजी मारेल. भारताने इंग्लंडपुढे विजयासाठी १८६ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा इंग्लंडने चांगला पाठलाग केला, पण त्यांना विजय मिळवता आला नाही.

काल झालेला सामना गाजवला तो सूर्यकुमार यादवने. सूर्यकुमार यादवच्या झंझावाती अर्धशतकाच्या जोरावर भारताला प्रथम फलंदाजी करताना १८५ धावा करता आल्या. सूर्यकुमार २८ चेंडूंत आपले पहिले अर्धशतक साकारले. पण त्यानंतर मोठा फटका मारण्याच्या नादात सूर्यकुमार बाद झाला. सूर्यकुमारने यावेळी ३१ चेंडूंत सहा चौकार आणि तीन षटाकारांच्या जोरावर ५७ धावांची दमदार खेळी साकारली. रोहितने पहिल्याच चेंडूवर षटकार लगावत संघाला झोकात सुरुवात करुन दिली, पण रोहितला यावेळी १२ धावांवर समाधान मानावे लागले. चौथ्या सामन्यातही यावेळी लोकेश राहुल अपयशी ठरल्याचे पाहायला मिळाले. कारण राहुलला या सामन्यात १७ चेंडूंमध्ये फक्त १४ धावाच करता आल्या. त्याचबरोबर भारताचा कर्णधार विराट कोहलीही यावेळी अपयशी ठरल्याचे पाहायला मिळाले. कोहलीला यावेळी फक्त एकाच धावेवर समाधान मानावे लागले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here