अहमदाबाद, : सातत्याने अपयशी ठरत असतानाही लोकेळ राहुलला भारतीय संघात कायम ठेवले जात आहे. पण दुसरीकडे राहुलला संधी देताना मात्र सलामीवीर शिखर धवनवर मात्र विराट कोहली एक कर्णधार म्हणून शिखर धवनवर अन्याय करत असल्याचे दिसत आहे.

गेल्या पाच सामन्यांमध्ये जर राहुल आणि धवन यांची कामगिरी पाहिली, तर त्यामध्ये शिखर हा नक्कीच राहुलपेक्षा उजवा ठरत आहे. पण असे असून देखील कर्णधार कोहलीने राहुलला चारही सामन्यांमध्ये खेळवले आहे, पण धवनला मात्र एका सामन्याती अपयशानंतर संघातून डच्चू दिला आहे.

गेल्या पाच डावांमध्ये पाहिले तर राहुल हा तब्बल तीनवेळा शून्यावर बाद झाल्याचे पाहायला मिळाले आहे. कारण सिडनी येथे झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेन्टी-२० सामन्यात राहुलला भोपळाही फोडता आला नव्हता. त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात राहुलला फक्त एकच धाव काढता आली होती. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यामध्ये राहुल हा शून्यावर बाद झाला होता. सलग दोन सामन्यांमध्ये शून्यावर बाद झाल्यावर राहुलला चौथ्या सामन्यात संधी मिळणार नाही, असे वाटत होते. पण राहुलला पुन्हा एकदा चौथ्या सामन्यात संधी दिली आणि तो पुन्हा एकदा अपयशी ठरल्याचे पाहायला मिळाले. चौथ्या सामन्यात राहुलला १४ धावांवर समाधान मानावे लागले होते. पण गेल्या पाच डावांमध्ये धवनने दोन अर्धशतके लगावली आहेत.

गेल्या पाच डावांमध्ये राहुलपेक्षा धवनची कामगिरीस सरस ठरली आहे. कारण धवनने गेल्या पाच डावांमध्ये दोन अर्धशतके लगावली आहेत. पण राहुलला पाच डावांमध्ये मिळून ५० धावाही करता आलेल्या नाहीत. राहुलच्या खात्यात पाच डावांमध्ये फक्त १५ धावा आहेत. धवनने सिडनी येथे झालेल्या सामन्यात अर्धशतकी खेळी साकारली होती. त्यापूर्वी पुण्यात श्रीलंकेविरुद्ध झालेल्या ट्वेन्टी-२० सामन्यात धवनने अर्धशतक पूर्ण केले होते. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात धववने चार तर राहुलने एक धाव केली होती. पण त्यावेळी धवनला संघातून वगळण्यात आले आणि त्याच्याजागी इशान किशनला संघात स्थान देण्यात आले. पण धावा आणि फॉर्मचा विचार करता शिखर धवन हा सध्याच्या घडीला लोकेश राहुलपेक्षा सरस दिसत आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here