वाचा:
मुंबईत ते पत्रकारांशी बोलत होते. ‘कोविडची साथ आणि लसीकरणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू आहे. एका बाजूला राज्यात राज्यात कोविड वाढतोय म्हणून बोंब मारायची आणि दुसरीकडं केंद्र सरकारनं कुठलंही सहकार्य करायचं नाही. महाराष्ट्रात निवडणुका नाहीत म्हणूनच हे सगळं सुरू आहे,’ असा आरोप राऊत यांनी केला.
वाचा:
‘कोविड लसीचा पुरवठा असेल किंवा अन्य काही मदत देण्याचा प्रश्न असेल, महाराष्ट्रावर सातत्यानं अन्याय होतोय. हा माझा आरोप नाही. मी तसं बोलणं योग्यही नाही. राज्याचे आरोग्यमंत्री, कोविड टास्क फोर्सचे प्रमुख शशांक जोशी यांनीच तशी भूमिका मांडली आहे, असं सांगून, राज्य सरकारनं या संदर्भात आवाज उठवत राहिलं पाहिजे,’ असं राऊत म्हणाले.
मुंबईत भगवा फडकतच राहणार!
जळगाव महापालिकेतील भाजपच्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर राऊत यांना मुंबई महापालिकेतील आगामी निवडणुकीबद्दल विचारणा करण्यात आली. त्याबाबत ते म्हणाले, ‘मुंबई महापालिकेत मागील २५ ते ३० वर्षे परफेक्ट कार्यक्रम सुरूच आहे. तो यापुढंही सुरूच राहणार. कोणी कितीही प्रयत्न केले तरी आमचा कार्यक्रम होणार नाही. आहे तोच कार्यक्रम सुरू राहणार. मुंबईवर भगवा फडकतोय आणि तो यापुढंही फडकत राहणार.’
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times