म.टा. प्रतिनिधी, अहमदनगर

‘राज्याचे अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि त्यांचा गृहविभाग चांगले काम करीत आहेत. विरोधासाठी विरोध म्हणून विरोधी पक्षाकडून काहीही बातम्या पेरल्या जात असल्या तरी देशमुख यांच्याकडील गृहखाते जाणार नाही, असा आपल्या विश्वास वाटतो,’ अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री (Balasaheb Thorat) यांनी व्यक्त केली. ( says that home will not be taken away from )

थोरात यांनी संगमनेरमध्ये त्यांच्या अधिपत्याखालील विविध सहकारी संस्थांच्या ऑनलाइन पद्धतीने सभा घेतल्या. त्यानंतर प्रसार माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर आढळून आलेली स्फोटके, त्यानंतर मनसुख हिरन यांचा संशयास्पद मृत्यू यावरून राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. विरोधकांनी यासंबंधी आवाज उठविल्यानंतर पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. त्यानंतर गृहमंत्री देशमुख यांच्याकडून गृहखाते काढून घेतले जाणार अशीही चर्चा सुरू झाली आहे. यावर थोरात यांनी प्रतिक्रिया देताना सरकार आणि गृहमंत्र्यांचीही पाठराखण केली आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना थोरात म्हणाले, ‘विरोधकांकडून अशा प्रकरणांवरून चर्चा घडविल्या जात असतात. मात्र, अशा चर्चा आणि बातम्या चार दिवस टिकतात. सरकारला अडचणीत आणण्यासाठी विरोधकांचे विविध प्रयत्न सुरू आहेत. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार भक्कमपणे पाठीशी आहेत. अशा चर्चांना बळी पडून ते काहीही घाईचा निर्णय घेणार नाहीत, असे वाटते.’

शिवाय गृहमंत्री देशमुख आणि त्यांच्या गृहविभागाचे काम चांगले आहे. काही चुकत असेल तर तेथे कारवाई आणि दुरूस्ती होईल. मात्र, यावरून देशमुख यांच्याकडील गृहखाते काढून घेतले जाईल, असे मला अजिबात वाटत नाही, असेही थोरात म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा-
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले सध्या जिल्हानिहाय आढावा बैठका घेत आहेत. नगरमध्ये शहराध्यक्ष निवडीवरून निर्माण झालेला वाद त्यांच्यापर्यंत नेण्यात आला होता. थोरात यांच्या काळात झालेल्या या नियुक्तीवरून कार्यकर्त्यांची तक्रार होती. त्यावर पटोले यांनी जेथे अशा चुका झाल्या असतील, त्यांची दुरूस्ती केली जाईल, असे आश्वासन दिले होते. यावरून थोरात यांच्या काळातील काही निर्णय आता फिरविले जाणार असल्याचे बोलले जाऊ लागले. यासंबंधी बोलताना थोरात म्हणाले, ‘पटोले यांच्याकडे सध्या प्रदेश काँग्रेसचे नेतृत्व आहे. पक्षातील निर्णय समन्वयातून घेतले जातात. त्यादृष्टीने आमच्यात चांगला समन्वय आहे. सोशल मीडियातून विनाकारण वादाचे चित्र निर्माण केले जात असून तशी परिस्थिती नाही. जेथे कोठे वाद असेल तेथील प्रश्न चर्चेतून सोडविले जातील,’ असेही थोरात म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here