वाचा:
नागपुरातील करोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी येथील विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीला ते उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी कठोर लॉकडाऊनविषयी नापसंती व्यक्त केली. ‘सातत्याने लॉकडाऊन होत असल्याने सामान्य नागरिकांचे त्यामुळे अतोनात हाल होत आहेत. त्यामुळे आता संपूर्ण लॉकडाऊनपेक्षा निर्बंधयुक्त लॉकडाऊन केला पाहिजे. शिवाय, आता लसीकरण उपलब्ध असल्याने त्यावर अधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे. नागपुरात केवळ ८८ केंद्रांतून सध्या लस दिली जात आहेत, तर ग्रामीण भागात ७९ केेंद्रातून दिली जात आहे. एकट्या नागपूर शहरात प्रत्येक वॉर्डात एक याप्रमाणे किमान १५१ लसीकरण केंद्रांची आवश्यकता आहे. ६० वर्षांहून अधिक आणि सहव्याधी असलेले ४५ वर्षांपेक्षा अधिक हा वयोगट लक्षात घेतला तरी नागपुरात ६,८७,००० जणांचे लसीकरण एप्रिलपूर्वी होणे आवश्यक आहे. आज दिवसाला केवळ ८ ते १० हजार लसीकरण होत आहे. त्यामुळे उद्दिष्ट गाठायचे असेल तर ४० हजार लसीकरण प्रतिदिवशी होणे आवश्यक आहे. काही सामाजिक संघटनांच्या मदतीने ठिकठिकाणी लसीकरण केंद्र उघडता आले तर त्यामुळे मोठी मदत होऊ शकेल आणि लक्ष्य लवकर गाठता येईल,’ असं ते म्हणाले.
वाचा:
‘करोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असल्यानं पूर्वीप्रमाणेच कोविड खाटांची आणि कोविड रुग्णालयांची सुद्धा गरज येत्या काळात भासणार आहे. बरेचदा लक्षणे नसलेले व्यक्ती रुग्णालयात दाखल होतात आणि त्यामुळे लक्षणे असलेल्या व्यक्तींना खाटा उपलब्ध होत नाहीत. परिणामी नागपुरात मृत्यूसंख्या सुद्धा वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे रुग्णालय व्यवस्थापनावर येणार्या काळात कटाक्ष असला पाहिजे. रुग्णांची लूट होणार नाही, यासाठी पुन्हा पूर्वीची ऑडिट यंत्रणा उभारावी लागेल. मेडिकल आणि मेयोत काही असुविधा आहेत. उच्च न्यायालयाने त्या लक्षात आणून दिलेल्या आहेत. तेथे गरीब रुग्ण मोठ्या संख्येने जात असल्याने त्याकडे काटेकोरपणे लक्ष देण्याची गरज आहे. नागपूर शहरात गेल्या काळात स्मार्ट सिटीची कामे करताना आपण सीसीटीव्ही यंत्रणा जागोजागी उभी केली आहे. त्यामुळे त्यांची मदत घेऊन विलगीकरणाचा नियम मोडणार्यांना सक्तीने संस्थात्मक विलगीकरणात दाखल करण्याच्या दृष्टीने पुढाकार घेतला पाहिजे. मागील लॉकडाऊनच्या काळात अनेकांनी मंगल कार्यालये किंवा हॉल्स बुक केले होते. आता ते पैसे परत द्यायला तयार नाहीत. त्यामुळे सामान्य नागरिकांचे नुकसान होणार नाही, यासाठी काहीतरी एसओपी तयार केले पाहिजेत, अशीही अपेक्षाही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times