अहमदाबाद, : पाचव्या आणि निर्णायक सामन्यात रोहित शर्मा, विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांनी इंग्लंडच्या गोलंदाजीची चांगलीच धुलाई केल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळेच भारताला या महत्वाच्या सामन्यात इंग्लंडपुढे २२५ धावांचे आव्हान ठेवता आले.

इंग्लंडने नाणेफेक जिंकत भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले होते. पण रोहित आणि विराट यांनी सलामीला येत इंग्लंडच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतल्याचे पाहायला मिळाले. या दोघांनी धडाकेबाज फटकेबाजी करत पहिल्या सहा षटकांच्या पॉवर प्लेमध्ये बिनबाद ६० अशी धावसंख्या उभारली. रोहितने तर यावेळी षटकारासह आपले अर्धशतक साजरे केले. पण अर्धशतक साकारल्यावर रोहितला मोठी खेळी साकारता आली नाही. रोहितने यावेळी फक्त ३४ चेंडूंत चार चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर ६४ धावांची महत्वपूर्ण खेळी साकारली. रोहितला यावेळी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज बेन स्टोक्सने बाद केले. पण त्यापूर्वी रोहित आणि कोहली यांनी ९४ धावांची सलामी दिली होती.

रोहित बाद झाल्यावर सूर्यकुमार यादव फलंदाजीला आला आणि त्यानेही इंग्लंडच्या गोलंदाजीवर हल्ला चढवला. यावेळी विराटपेक्षा सूर्युकुमार अधिक आक्रमक फलंदाजी करत असल्याचे पाहायला मिळाले. या दोघांनी दमदार फलंदाजी करत भारताला १४३ धावांपर्यंत मजल मारुन दिली. पण सूर्यकुमारचा अप्रितम झेल यावेळी सीमारेषेवर पकडल्याचे पाहायला मिळाले. सूर्यकुमारने यावेळी १७ चेंडूंत ३ चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ३२ धावा फटकावल्या.

सूर्यकुमार यादव बाद झाल्यावर हार्दिक पंड्याला चौथ्या स्थानावर बढती देण्याचा निर्णय घेण्यात आला. पण त्यानंतर विराट कोहलीने यावेळी ३६ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. यावेळी कोहलीने प्रत्येकी दोन चौकार आणि षटकार लगावले होते. हार्दिक पंड्याही यावेळी दमदार फलंदाजी करत होता. आपल्या दिलेल्या चौथ्या क्रमांकावरील बढतीचा हार्दिकने यावेळी चांगला फायदा उठवला आणि भारताची धावगती वाढवण्यात मोलाचा वाटा उचलला. अर्धशतक झळकावल्यावर विराट कोहलीही अधिक आक्रमकपणे फटकेबाजी करत होता. त्यामुळेच भारताला यावेळी दोनशे धावांचा टप्पा सहजपणे गाठता आला.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here