वाचा:
राज्यात गेल्या काही दिवसांपासून करोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असल्याचे दिसत आहे. सलग दोन दिवस २५ हजारांवर नवीन रुग्णांची नोंद झाल्यानंतर आज नवा उच्चांक गाठला गेला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा तसेच प्रशासन हादरलं आहे. यात , , आणि या शहरांत करोनाची सर्वाधिक रुग्णवाढ होत आहे. त्यामुळे या शहरांत आधीच कोविडचे नियम कठोर करण्यात आलेले आहेत. अशावेळी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यासाठी लॉकडाऊनसारखे कठोर आणि टोकाचे पाऊल उचलू शकतात, असेही बोलले जात आहे.
वाचा:
राज्यात आज २७ हजार १२६ नवीन रुग्णांचे निदान झाले असून करोना संसर्गाने महाराष्ट्रात शिरकाव केल्यापासूनचा हा उच्चांकी आकडा ठरला आहे. आज १३ हजार ५८८ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून आतापर्यंत एकूण २२ लाख ३ हजार ५५३ करोना बाधित रुग्णांनी करोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. नवे रुग्ण वाढत असल्याने राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) घसरू लागले असून आज हे प्रमाण ८९.९७ टक्के एवढे आहे. राज्यात आज ९२ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून आतापर्यंत करोनाने ५३ हजार ३०० जणांचा बळी गेली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१८ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ८२ लाख १८ हजार १ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २४ लाख ४९ हजार १४७ (१३.४४ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ९ लाख १८ हजार ४०८ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत तर ७ हजार ९५३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
वाचा:
राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आता दोन लाखांच्या जवळ पोहचली आहे. आजच्या आकडेवारीनुसार १ लाख ९१ हजार ६ इतके अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यात सर्वाधिक ३८ हजार ८०३ रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत. त्यानंतर नागपूर जिल्ह्यात २८ हजार ४२३, मुंबई पालिका हद्दीत २० हजार १९, ठाणे जिल्ह्यात १८ हजार ८८ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. औरंगाबाद आणि नाशिक या जिल्ह्यांतील अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडाही १३ हजार पार गेला आहे. पुणे पालिका हद्दीत आज ३ हजार २००, मुंबई पालिका हद्दीत २ हजार ९८२ तर नागपूर पालिका हद्दीत २ हजार ८७३ नवीन रुग्णांची भर पडली.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times