राजीनामा घ्यायचा की नाही हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर परमबीर सिंग यांनी गंभीर आरोप केल्यानंतर विरोधी पक्षांनी त्यांच्या तत्काळ राजीनाम्याची मागणी केली. यावर देखील शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. गृहमंत्री देशमुख यांचा राजीनामा घ्यायचा की नाही हा अधिकार सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा आहे. म्हणून राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच निर्णय घेतील असे पवार यांनी स्पष्ट केले.
क्लिक करा आणि वाचा-
राजीनाम्याचा निर्णय दोन दिवसात
मात्र, राजीनामा घेण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा असला तरी राजीनाम्याबाबत येत्या दोन दिवसात निर्णय घेण्यात येईल असेही शरद पवार म्हणाले. गृहमंत्री अनिल देशमुख उद्या मुंबईत येतील. त्यानंतर त्यांचे काय म्हणणे आहे ते ऐकले जाईल. त्यानंतर इतरही नेत्यांशी बोलून देशमुख यांच्या राजीनाम्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल, असे पवार यांनी म्हटले आहे. पवार यांच्या या भूमिकेमुळे अनिल देशमुख हे गृहमंत्रीपदावर राहणार की त्यांना हटवले जाणार हे येत्या दोन दिवसात ठरण्याची शक्यता आहे.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times