म. टा. प्रतिनिधी, : टिळक चौकात विनापरवाना आंदोलन करून करोना संसर्गाबाबत कोणतीही काळजी घेतली नसल्याच्या आरोपावरून भारतीय जनता पक्षाचे आमदार यांच्यासह पक्षाच्या ५० जणांवर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस हवालदार संतोष तुर्के यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार चंद्रकांत पाटील, जगदीश मुळीक, योगेश टिळेकर, राजेश पांडे, गणेश घोष, राजेश येणपुरे, सुशिल मेंगडे, संदीप खेडकर, धीरज घाटे,दीपक पोटे, प्रमोद कोंढरे, वर्षा तापकीर, कल्पना पुरंदरे अशा ४० ते ५० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या सर्वांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील व इतरांनी रविवारी सकाळी टिळक चौकात सरकारच्या विरोधात विनापरवानगी एकत्र येऊन आंदोलन केले. करोनामुळे शहरात प्रतिबंधात्मक आदेश लागू आहेत. याची त्यांना पोलिसांनी माहिती दिली. तसेच, लेखी व तोंडी समजावून सांगितले. तरीही आदेशाचे उल्लंघन करून चौकात आंदोलन करत महाराष्ट्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. करोना संसर्ग रोखण्यासाठी खबरदारी न घेता इतरांच्या जीवाला धोका निर्माण केला. या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या आंदोलनासाठी पोलिसांकडून मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here