पुणे: पुणे, मुंबई आणि नागपुरात करोनाचे रुग्ण वाढत असून ही वाढती रुग्णसंख्या धोक्याची आहे. नागरिकांनी नियमांचे पालन न केल्यास लॉकडाऊन करावे लागेल, अशा शब्दात राज्याचे आरोग्यमंत्री यांनी पुन्हा एकदा लॉकडाऊनचा इशारा दिला आहे.

महाराष्ट्रात करोनाची दुसरी लाट आल्याचे चित्र आहे. करोनाचे रुग्ण झपाट्याने वाढू लागले आहेत. त्यात गेले काही दिवस रुग्णवाढीचा स्फोट झाल्याचे दिसत आहे. महाराष्ट्रात रुग्णसंख्येनं नवा उच्चांक गाठल्यानं चिंता वाढली आहे. मुंबई, पुणे, नागपुर या तीन शहरात सातत्याने रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळं रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी पुन्हा लॉकडाऊन होणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. अखेर आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीच जर नियम पाळले नाही तर लॉकडाऊन लवावा लागेल, असं म्हटलं आहे.

लॉकडाऊन करण्याबाबत चर्चा सुरू आहेत. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहोत. त्याच्यांशी चर्चा झाल्यानंतर लॉकडाऊन बाबत निर्णय घेण्यात येईल, असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.

पुण्यात सर्वाधिक चाचण्या सुरु

राज्यात करोनाच्या पार्श्वभूमीवर, ३ लाख जणांना दररोज लसीकरण राबविण्यात येणार आहे. आतापर्यंत राज्यात ४५ लाख जणांचे लसीकरण करण्यात आले आहेत. राज्यात २४०० प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये लसीकरण करण्यात येणार आहे, अशी माहिती टोपेंनी दिली आहे.

पुण्यातील वाढत्या रुग्ण संख्येमुळं रुग्णालय फुल झाली असून पूर्वीचा ८०: २०चा फॉर्म्युला पुन्हा लागू करणार असे ही टोपे यांनी स्पष्ट करीत रुग्णालयातील खाटांची संख्या वाढण्याचा मार्ग मोकळा होईल, असंही म्हटलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here