मुंबई: १५ ते २७ फेब्रुवारीपर्यंत गृहमंत्री होम क्वॉरंटाईन होते, असा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा दावा खोटा असल्याचे म्हणत विधानसभेचे विरोधी पक्षनेते यांनी देशमुखांचा १५ तारखेचा पत्रकार परिषदेचा व्हिडिओ ट्विट केला आणि जर देशमुख क्वॉरंटाइन होते तर त्यांनी १५ फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषद कशी घेतली? असा सवाल उपस्थित केला. त्यावर रुग्णालयातून जिस्चार्ज दिल्यानंतर घरी जात असताना देशमुख पत्रकारांशी बोलले असे स्पष्टीकरण राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आणि खुद्द अनिल देशमुख यांनीही दिले. फडणवीसांच्या या टीकेवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार यांनी देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

आमदार रोहित पवार यांनी एका फेसबुक पोस्ट द्वारे देवेंद्र फडणवीस यांना उत्तर दिले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या या केविलवाण्या प्रयत्नांवरून मी पुन्हा येईनचे स्वप्न अजूनही जिवंत आहे हे प्रतीत होत असल्याचा टोला रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.

रोहित पवार आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणतात, ‘अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून आजपर्यंतच्या घडामोडी, सरकारवरील आरोपांची मालिका बघता नेमकं काय होतंय, कशासाठी होतंय आणि कोण करतंय याचा अंदाज प्रत्येकाला नक्कीच आला असेल. गृहमंत्री महोदयांनी हॉस्पिटलमध्ये दिलेल्या ‘प्रेस बाईट’चे व्हिडिओ ट्विट करून विरोधी पक्षनेत्यांनी जो केविलवाणा प्रयत्न केला यातून त्यांच्या मनात ‘मी पुन्हा येईन’चे स्वप्न अजूनही जिवंत असल्याचं प्रतीत होतं.’

गृहमंत्र्यांना क्वारंटाईन होण्यास सांगितलं असताना त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवर सुधीर मुनगंटीवार साहेबांनी आक्षेप घेतला. पण त्यांनी विरोधी पक्षनेत्यांनी ४ नोव्हेंबर २०२० रोजी दवाखान्यातून डिस्चार्ज घेतानाचे ट्विट केलेले फोटो बघावेत आणि मग आपल्या आक्षेपाचा विचार करावा. महाराष्ट्राच्या हक्कांवर गदा येत असताना जे कधी एक शब्दही बोलले नाहीत ते आज महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी संसदेत आक्रमक झालेले दिसले. केवळ राजकीय पतंग न उडवता महाराष्ट्राच्या हिताचं काम केलं तर महाराष्ट्र नक्कीच आपला अभिमान बाळगेल, हे त्यांनी लक्षात घ्यायला हवं, असेही रोहित पवार यांनी म्हटले आहे.

क्लिक करा आणि वाचा-
संसदेत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची झालेली मागणी, राज्यात विरोधी पक्षनेत्यांनी केलेले ट्विट्स, काहींनी राज्यपालांना भेटून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची केलेली मागणी या गोष्टी बघता विरोधी पक्ष सत्तेसाठी किती उतावीळ झालाय, हे सगळ्या महाराष्ट्राने आज पाहिले, असा टोलाही त्यांनी विरोधी पक्षाला लगावला आहे.

‘परमबीर सिंग दिल्लीत कोणाला भेटले?’

रोहित पवार म्हणतात, ‘एखाद्या व्यक्तीला पदावरून काढल्यानंतरच ती झालेल्या गैरकारभाराबद्दल बोलू लागते, म्हणजे गैरकारभार झालाय की पदावरून गेल्याचं दुःख आहे, हा प्रश्नही महत्वाचा आहे. हातात अधिकार असताना काहीही न बोलणारे पदावरून हटवताच बेछूट आरोप करत सुटतात, याचा अर्थ काय समजावा? आज हा अधिकारी दिल्लीत कोणाला भेटला? नंतर सर्वोच न्यायालयात याचिका दाखल करत सीबीआय चौकशीची मागणी का करतो? तो स्वतः बोलतोय की कुठली राजकीय शक्ती एखाद्या राजकीय हेतूपोटी या अधिकाऱ्याकडून हे सगळं वदवून घेतेय, अशी शंका निर्माण होत आहे.’

क्लिक करा आणि वाचा-
हा सगळा प्रकार आणि गेल्या काही दिवसातील घडामोडी बघता मार्क ट्वेनच्या ‘सत्य समोर येईपर्यंत असत्य गावभर हिंडून येतं’, या वाक्याची प्रचिती येते आणि हा राजकीय पोळ्या भाजण्याचा प्रयत्न असल्याचा दाट संशय येतो, असे पवार पुढे लिहितात.

अनैतिक मार्गांने सरकार पाडणं शक्य होत नसल्याने बेछूट आरोप करून सरकारविषयी जनतेच्या मनातली आपलेपणाची भावना नाहीशी करण्याचा विरोधी पक्षाचा नेहमीच प्रयत्न राहिलाय. आरोप असतील तर चौकशी होऊन सत्य समोर येईलच, परंतु सत्तेसाठी कुठल्या थराला जायचं याचा विचार मात्र विरोधकांनी करावा, असा टोलाही त्यांनी लगावला.

क्लिक करा आणि वाचा-
काही महिन्यांपूर्वीही सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणावरून महाराष्ट्राला बदनाम करण्याचा डाव खेळण्यात आला, परंतु त्या ठिकाणीही सत्य समोर आलंच. या प्रकरणीही सत्य समोर येईलच, परंतु या सर्व घडामोडींमध्ये जनतेचे मूलभूत प्रश्न बाजूला पडू नयेत अशी अपेक्षा त्यांनी शेवटी व्यक्त केली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here