देशात करोनाची वाढती रुग्णसंख्या आणि लसीकरण मोहीमेसंदर्भात गेल्या आठवड्यात पंतप्रधान मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंद्वारे राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला होता. यावेळी मोदींनी करोनावरील लसीचे डोस मोठ्या प्रमाणात वाया जाण्याचा मुद्दा उपस्थित केला होता. तेलंगण, आंध्र प्रदेश आणि उत्तर प्रदेशात १० टक्क्यांहून अधिक करोनावरील लसीचे डोस वाया म्हणजे फेकण्यात जात असल्याचं मोदी म्हणाले होते. राज्यांनी समीक्षा करून फेकण्यात जाणारे लसीच्या डोसचे प्रमाण कमी केले पाहिजे, असं आवाहन मोदींनी केलं होतं. त्यानंतर लेगचच केंद्रीय आरोग्य सचिव यांनी माध्यमांशी संवाद साधला होता. तेलंगणमध्ये करोनावरील लसीचे डोस वाया जाण्याचे प्रमाण हे १७ टक्के आहे तर राष्ट्रीय सरासरी ६.५ टक्के आहे, असं भूषण म्हणाले होते.
करोनाविरोधी लढाईत आज आपण जिथे आहोत आणि त्यातून जो आत्मविश्वास मिळवला आहे त्यामुळे हलगर्जीपणा वाढू नये. आपल्याला जनतेला घाबरवायचं नाहीए आणि चिंतामुक्तही करायचं आहे. आता ‘टेस्ट, ट्रॅक आणि ट्रीट’ या मंत्रावर गंभीरतेने काम केले पाहिजे, असं पंतप्रधान मोदी त्यावेळी म्हणाले होते.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times