मनोज तिवारी यांनी ट्विट करून त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हे सर्व फेल जाणार आहेत. मी जे ट्विट केलंय ते सेव्ह करून ठेवा. भाजप दिल्लीत ४८ जागा जिंकून सरकार स्थापन करेल. पण कृपा करून आतापासून ईव्हीएमचा बहाणा शोधू नका, असं तिवारी यांनी म्हटलं आहे.
तर पश्चिम दिल्लीचे भाजपचे खासदार परवेश वर्मा यांनीही त्यांचा अंदाज वर्तवला आहे. वर्मा यांच्या मते भाजपला ५० जागा मिळतील. तर आम आदमी पार्टीला १६ आणि काँग्रेसला अवघ्या चार जागा मिळतील. तिवारी आणि वर्मा यांनी भाजपला पूर्ण बहुमत मिळण्याचा आणि सर्व एक्झिट पोल खोटे ठरण्याचा दावा केल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.
सर्वच एक्झिट पोलमध्ये आम आदमी पार्टीला ५५ हून अधिक जागा मिळणार असल्याचं भाकीत वर्तवण्यात आलं आहे. तर भाजपला केवळ १५ ते २६ जागा मिळतील असं स्पष्ट करण्यता आलं आहे. सुदर्शन न्यूज आणि टाइम्स नाऊच्या एक्झिट पोलमध्ये भाजपला सर्वाधिक म्हणजे २६ जागा दाखविल्या आहेत. दिल्लीत ७० जागांसाठी आज मतदान पार पडलं. बहुमतासाठी अवघ्या ३६ जागांची अवश्यकता आहे. त्यामुळे येत्या ११ फेब्रुवारी रोजी लागणाऱ्या निकालाकडे सर्वांचं लक्ष वेधलं गेलं आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times