वाचा:
नगर शहरात नगर-मनमाड महामार्गावर शहरापासून जवळच हॉटेल चालविणाऱ्या आणि सामाजिक कार्यातही अग्रेसर असलेल्या या व्यावसायिकाचा ६१ वा वाढदिवस होता. त्यानिमित्त नातेवाईक, मित्र आणि समाजातील काही जवळच्या वक्तींची वैष्णवदेवी, जम्मू, काश्मीर, पंजाबमधील अमृतसर या भागातील विविध धार्मिक ठिकाणी भेटी देण्यासाठी सहल काढण्यात आली. १४ मार्चला वाढदिवस होता. त्यासाठी १० ते १८ मार्च अशी सहल काढण्यात आली. यामध्ये नगर शहर, श्रीरामपूर, शेवगाव या ठिकाणांहून १८५ जण सहभागी झाले. प्रवासाला निघण्यापूर्वी सर्वांची कोविड चाचणी करून घेण्यात आली. संसर्ग नसलेल्यांनाच सहलीला नेण्यात आले. सर्वजण नगरहून रेल्वेने गेले होते.
मात्र, पुढे गेल्यावर झाले भलतेच. काही जणांनी त्रास होऊ लागला. त्यामुळे ते मध्येच परतले. नगरला आल्यावर त्यांची तपासणी केली असता त्यातील अनेक जणांना संसर्ग झाल्याचे आढळून आले. सहल संपल्यावर उरलेली मंडळीही नगरला परतली. त्यातील अनेकांना त्रास जाणवून लागल्याने त्यांनीही तपासणी करून घेतली. त्यातील अनेकांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. एकूण सुमारे दीडशेहून अधिक जणांना करोनाची बाधा झाल्याचे आढळून आले. ज्यांचा वाढदिवस होता, त्यांच्या घरातील व्यक्तींना लागण झाली. यातील काही जण बरे होऊन घरी परतले, काहींवर उपचार सुरू आहेत, तर काही घरीच उपचार घेत आहेत. मात्र, नगरच्या एकूण संख्येत भर टाकण्यासाठी ही सहल कारणीभूत ठरल्याची चर्चा संबंधितांमध्ये सुरू आहे. व्यावसायासोबतच आपल्या समाजासाठी आणि एकूणच शहरासाठीही विविध उपक्रम राबविण्यात अग्रेसर असलेल्या या सामाजिक कार्यकर्त्याने आयोजित केलेल्या सहलीतच हा प्रकार घडला. त्यामागे त्यांची भावना चांगली असली तरी करोनाच्या परिस्थितीचा विचार करून निर्णय घ्यायला हवा होता, इतरांनी तरी यातून बोध घ्यावा, असेही नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times