मुंबई/ : आणि ठाणे जिल्ह्यात गर्दी नियंत्रणात येत नसल्याने करोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. मंगळवारी हद्द तसेच ठाणे जिल्ह्यात मिळून सहा हजारांवर नवीन रुग्णांची भर पडली आहे. मुंबईत २४ तासांत ८ रुग्ण करोनाने दगावले तर ठाणे जिल्ह्यात ११ जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने मुंबई पालिकेने कठोर पाऊल उचलत आणि धूलिवंदन सार्वजनिकरित्या साजरे करण्यास मनाई केली आहे. ( )

वाचा:

मुंबईत मंगळवारी ३ हजार ५१२ नवीन बाधितांची भर पडली तर १ हजार २०३ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले. मुंबईत आतापर्यंत ३ लाख ६९ हजार ४२६ जणांना करोनाची लागण झाली असून त्यातील ३ लाख २९ हजार २३४ रुग्ण बरे झाले आहेत तर ११ हजार ६०० जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत सध्या करोनाचे २७ हजार ६७२ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. मुंबईत रिकव्हरी रेट ९० टक्क्यांपर्यंत खाली आला असून सध्या रुग्ण दुपटीचा कालावधी ९० दिवस इतका आहे. सध्या शहरात ३८ कंटेन्मेंट झोन आहेत तर ३६३ इमारती सील करण्यात आल्या आहेत.

वाचा:

ठाण्यात उच्चांकी रुग्णसंख्या

ठाणे जिल्ह्यात करोनाची चिंता वाढत चालली आहे. मंगळवारी नवीन २ हजार ५३८ रुग्ण आढळून आले असून मागील काही महिन्यातील ही उच्चांकी रुग्णवाढ आहे. ठाणे शहरात दिवसभरात नवीन ७७५, कल्याण-डोंबिवली ७११, नवी मुंबई ४५६, मिरा-भाईंदर १७०, उल्हासनगर १२३, भिवंडी ३९, अंबरनाथ १०६, बदलापूर ११२, ठाणे ग्रामीणमध्ये ४६ रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या २ लाख ९३ हजार १५४ वर पोहचली असून मंगळवारी १ हजार २४४ रुग्ण बरे झाले. त्यामुळे आतापर्यंत २ लाख ६८ हजार ९१८ रुग्ण करोनामुक्त झाले असून सध्या १७ हजार ८३३ रुग्ण उपचार घेत आहेत. दिवसभरात ११ रुग्णांचा मृत्यू झाल्याने करोनाबळींचा आकडा वाढत ६ हजार ४०३ वर गेला आहे.

दरम्यान, गर्दी नियंत्रणात येत नसल्याने मुंबई आणि ठाण्यात करोनाचा वेगाने फैलाव होत आहे. ही स्थिती लक्षात घेऊन मुंबई पालिकेने होळी साजरी करण्यास मनाई केली आहे. रुग्णसंख्या अशीच वाढत गेल्यास प्रशासनापुढे लॉकडाऊन हाच एकमेव पर्याय उरणार आहे. तसे संकेतही वेळोवेळी देण्यात आलेले आहेत.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here