मुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त यांच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची विनंती सुप्रीम कोर्टाने मान्य केली असून उद्या (बुधवारी) न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि न्यायमूर्ती आर. सुभाष रेड्डी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. ( )

वाचा:

परमबीर सिंग यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांना पत्र लिहून गृहमंत्री यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अनिल देशमुख यांनी यांना दरमहा १०० कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिले होते, असा दावा परमबीर सिंग यांच्या पत्रात करण्यात आलेला आहे. याप्रकरणी पुरावे नष्ट केले जाण्याची भीती व्यक्त करत परमबीर यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. आपल्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यात यावी व सीबीआय चौकशीचे निर्देश देण्यात यावेत, अशी विनंती परमबीर यांनी याचिकेत केली आहे.

वाचा:

परमबीर यांच्या या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची विनंती सुप्रीम कोर्टाने आज मान्य केली असून उद्या (२४ मार्च) या याचिकेवर सुनावणी होणार आहे. परमबीर यांची मुंबई पोलीस आयुक्तपदावरून उचलबांगडी करून गृह रक्षक दलात बदली करण्यात आली असून त्या बदलीलाही सिंग यांनी याचिकेत आव्हान दिले आहे. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर आढळलेल्या स्फोटकांप्रकरणी मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राइम इंटेलिजन्स युनिटमध्ये सेवेत असलेले व आता निलंबित करण्यात आलेले सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना राष्ट्रीय तपास संस्थेने अटक केल्यानंतर पोलीस दलात मोठे फेरबदल करत परमबीर यांची तडकाफडकी बदली करण्यात आली होती. वाझे हे थेट परमबीर यांना रिपोर्ट करायचे. त्यामुळे कुठेतरी वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही चूक झालेली आहे, असे मानून सरकारने सिंग यांची बदली करत दणका दिला होता. या बदलीनंतर नाराज असलेल्या सिंग यांनी अनिल देशमुख यांच्याविरुद्ध लेटरबॉम्ब टाकला होता. सिंग यांच्या आरोपांवरून राज्यातलं राजकारण ढवळून निघालं आहे. पोलीस दलातही मोठी खळबळ माजलेली आहे. दुसरीकडे देशमुख यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले असून त्यांनीही सिंग यांच्याविरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिलेला आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here