नवी दिल्लीः मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग ( ) यांनी मुख्यमंत्री () आणि राज्यपालांना लिहिलेल्या १०० कोटींच्या खंडणी वसुलीच्या पत्र प्रकरणामुळे महाराष्ट्रातील सरकार वादात सापडलं आहे. आता या प्रकरणावरून एका केंद्रीय मंत्र्याने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष () यांच्यावर निशाणा साधला आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीचे नेते शरद पवार हे ज्या प्रकारे गृहमंत्री यांची पाठराखण करत आहेत, त्यावरून तेही या प्रकरणात सामील तर नाही? असा सवाल केंद्रीय ऊर्जा मंत्री आर. के. सिंह यांनी उपस्थित करत संशय व्यक्त केला आहे. एवढचं नव्हे तर आर. के. सिंह यांनी परमबीर सिंग यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. परमबीर सिंग यांनी आपल्या पत्रातून नमुद केलेली १०० कोटींच्या वसुलीची गोष्ट खरी आहे, असं आर. के. सिंह म्हणाले.

दरम्यान, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात परमबीर सिंग यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला. तसंच परमबीर सिंग यांनी आपली याचिका आधी हायकोर्टात दाखल करावी, असंही सांगितलं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here