मुंबई: मुंबईतील नागरिकांना घराजवळ करोना लसीकरणाची () सोय उपलब्ध करून देण्याचा मुंबई महानगरपालिकेचा प्रयत्न आहे. त्यासाठी केंद्र सरकारची () परवानगी मिळणे आवश्यक असून महानगरपालिकेने यासाठी केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास मुंबईकरांना आपल्या घराशेजारी लसीकरणाची सोय उपलब्ध होणार आहे. ही माहिती मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. (facilitate citizens to be bmc proposal to the center)

३१ मे पर्यंत लसीलकरण पूर्ण करण्याचे पालिकेने लक्ष्य ठेवले आहे. मुंबईत सध्या होत असलेल्या कोविड चाचण्यांची संख्या दररोज सरासरी ४० ते ४५ हजार इतकी आहे. मात्र, मुंबईत करोनाची होणारी झापाट्याने होणारी वाढ लक्षात घेत मुंबईत दररोज एक लाख करोना चाचण्या घेण्याचे निर्देश महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिले आहेत. सर्वसामान्य नागरिकांचे लसीकरण वेगात व्हावे यासाठी नगरसेवक आणि सामाजिक संस्थांची मदत घेऊन लसीकरणाचा वेग वाढविण्याचा प्रयत्न पालिका करणार आहे.

आता ४५ वर्षांपर्यंतच्या सर्व नागरिक लस घेण्या पात्र आहेत. तसा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. सध्या ४५ ते ६० वर्षांमधील इतरही आजार असलेल्या नागरिकांना तसेच ज्येष्ठ नागरिकांना लशीचा डोस दिला जात आहे. मुंबईत सध्या १०० ठिकाणी लसीकरण सुरू आहे. मुंबईत ४५ वर्षावरील सदृढ गटातील नागरिकांची संख्या सुमारे ४० लाख इतकी आहे. दरम्यान, ४५ वर्षांपुढील सर्वांना लस देण्याची मुंबई महानगरपालिकेची तयारी असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. त्यासाठी तेवढ्या प्रमाणात लशीचा साठाही महापालिकेकडे उपलब्ध आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त काकाणी यांनी दिलीय.

क्लिक करा आणि वाचा-

पालिका लसीकरणाचा वेग वाढवणार

मुंबई महानगरपालिकेने लसीकरणाचा वेग वाढवण्याची योजना आखली आहे. त्यासाठी महानगरपालिका आता दोन पाळ्यांमध्ये लसीकरण सुरू करणार आहे. पहिली पाळी सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत असेल, तर दुसरी पाळी दुपारी २ ते रात्री ९ वाजेपर्यंत असणार आहे.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here