मुंबई: घुसखोराविरुद्ध आज निघणाऱ्या मनसेच्या महामोर्चामागे भाजपचा हात असल्याच्या शिवसेनेच्या आरोपाला मनसेनं जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ‘शिवसेनेच्या पायाखालची वाळू सरकल्याचं हे लक्षण आहे,’ असा पलटवार मनसेच्या नेत्यांनी केला आहे.

मराठीच्या मुद्द्यावरून राजकारण करणाऱ्या मनसेनं काही दिवसांपूर्वीच पक्षाचा झेंडा बदलून राजकीय ट्रॅक बदलण्याचे संकेत दिले होते. त्याच अधिवेशनात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील घुसखोरांचा मुद्दा उचलला होता व त्या विरोधात मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. मनसेची हिंदुत्वाच्या वाटेवर जाणार असल्याचं तेव्हाच स्पष्ट झालं होतं. मात्र, मनसेच्या भूमिकेतील हा बदल शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपनं केलेली खेळी असल्याचं शिवसेनेला वाटत आहे. शिवसेनेच्या प्रवक्त्या यांनी वृत्तवाहिन्यांशी बोलताना तसा स्पष्ट आरोप केला आहे.

वाचा:

शिवसेनेचा हा आरोप मनसेच्या नेत्यांनी खोडून काढला आहे. पाकिस्तान विरोधाची मनसेची भूमिका आजची नाही. याआधीही आम्ही त्यांच्या विरोधात आंदोलनं केली आहेत. त्यामुळं या आरोपात तथ्य नाही, असं मनसेचे नेते अनिल शिदोरे म्हणाले. तर, मनसेचे सरचिटणीस यांनी शिवसेनेवर तोंडसुख घेतलं. ‘ हीच राष्ट्रवादी काँग्रेसची बी टीम आहे. मनसेच्या महामोर्चावर त्यांच्याकडून होत असलेली टीका हे त्यांच्या पायाखालची वाळू सरकल्याचं लक्षण आहे, असं देशपांडे म्हणाले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here