गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी टाटा रुग्णालयाचे अधिकारी आणि म्हाडाच्या अधिकाऱ्यांसोबत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. टाटा रुग्णालयापासून 5 मिनिटाच्या अंतरावर असलेल्या हाजी कासम चाळ परिसरात म्हाडाचे 100 फ्लॅट्स आहेत. हे फ्लॅट्स टाटा रुग्णालयाला देण्याचे आव्हाड यांनी जाहीर केले. हे फ्लॅट टाटा कॅन्सर रुग्णालयाला देण्याबाबत काही दिवसांपूर्वी गृहनिर्माण मंत्री आव्हाड यांनी म्हटले होते. त्यानंतर आज हा निर्णय घेण्यात आला.
सध्या १०० फ्लॅट्स टाटा कॅन्सर हॉस्पिटलला देण्याचे ठरले आहे. मात्र पुढे ही संख्या २०० पर्यंत नेण्याचा सरकारचा विचार आहे. आपण हा निर्णय अवघ्या ७ दिवसात घेतल्याचेही आव्हाड यांनी सांगितले. यात यापुढे कोणताही राजकीय हस्तक्षेप होणार नसून या फ्लॅट्सची चाव्या दिल्यानंतर आता पुढील जबाबदारी टाटा कॅन्सर हॉस्पिटलची असेल असे आव्हाड म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा-
मुंबईतील टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येणाऱ्या एकूण रुग्णांपैकीरु ३९ टक्के रुग्ण हे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून येत असतात. तर, ६१ टक्के रुग्ण देशभरातून आलेले असतात. दरवर्षी ८० हजार रुग्णांवर उपचार करते. तर दररोज सुमारे ३०० रुग्णांच्या राहण्याची सोय करण्याची आवश्यकता भासत असते. मात्र यांपैकी सर्वच रुग्णांच्या राहण्याची सोय होण्याची सध्याची स्थिती नाही. आता सरकारने हॉस्पिटलला १०० फ्लॅट्स दिल्यामुळे १००० रुग्णांची सोय करता येणार आहे.
क्लिक करा आणि वाचा-
देशातील विविध राज्यांमधून, तसेच महाराष्ट्रातील जिल्ह्याजिल्ह्यातून मुंबईतील टाटा कॅन्सर रुग्णालयात हजारो सर्वसामान्य रुग्ण उपचारासाठी येत असतात. त्यांच्यासाठी टाटा कॅन्सर हॉस्पिटल हे शेवटचे आशास्थान असते. त्यांच्यापैकी अनेकांना मुंबईत राहण्याची सोय परवडत नसल्यामुळे रस्त्यावर, फूटपाथवर राहावे लागते. सरकारच्या या निर्णयामुळे आता यांपैकी अनेकांची चांगली सोय होणार आहे.
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times