अमरावती: महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी आरोप केल्यानंतर राज्याचे राजकीय वातावरण ढवळून निघाले. या पार्श्वभूमीवर खासदार अरविंद सावंत आणि यांच्यातील वाद चांगलाच पेटला. त्यानंतर पुन्हा नवनीत राणांनी शिवसेनेला लक्ष्य केले आहे. जोपर्यंत होते, तोपर्यंत शिवसेनेत छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जिवंत होते. परंतु बाळासाहेब ठाकरे गेले आणि शिवसेनेत महिलांचा आदर संपला, अशी टीका राणा यांनी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत प्रकरणी बोलताना लोकसभेत केली. (if rs 100 crore is recovered from mumbai alone, then how much is being recovered from maharashtra asks )

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी काही दिवसापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी महिन्याला शंभर कोटीच्या वसुलीची काम सचिन वाझेंना दिल्याचा आरोप केला. या “लेटरबॉम्ब”मुळे एकच खळबळ उडाली आहे. या लेटर बॉम्ब चे पडसाद भाजपने लोकसभेत उमटवले होते. १०० कोटींच्या वसुलीचे काम हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरूनच होत असल्याचा गंभीर आरोप खासदार नवनीत राणा यांनी केला होता आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली होती.

मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कारभाराविरोधात बोलत असल्याने मला शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी राज्यात फिरू न देण्याची व जेलमध्ये टाकण्याची धमकी दिल्याची तक्रार खासदार नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांना लिहलेल्या पत्रात केली होती.

या सभागृहाने आणि संविधानाने लोकांचे प्रश्न मांडण्याचा अधिकार मला दिला आहे. मागील नऊ वर्षात दिवस-रात्र एक करून मी या सभागृहात पोहोचली आहे. रक्ताचे पाणी करून मेहनत करून मी इथे आली आहे. कोणत्याही पक्षाच्या कुठल्याच नेत्याच्या धमक्यांना घाबरण्यासाठी मी इथे आलेली नाही. जर कुणी मला बाहेर धमकावण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्याच्याशी कसे लढायचे अशी चिंता नवनीत राणा यांनी व्यक्त केली.

क्लिक करा आणि वाचा-
महाराष्ट्रात खंडणी वसुली करण्याचे काम सुरू आहे. त्यावरुन मी सांगू इच्छिते की, जो व्यक्ती १६ वर्ष निलंबित होता, सात दिवस जेलमध्ये राहिला त्याला कोणत्या आधारे पुन्हा सेवेत घेतले?, असा सवाल राणा यांनी उपस्थित केला. जेव्हा भाजपाचे सरकार होते तेव्हा उद्धव ठाकरेंनी सचिन वाझेंना पुन्हा सेवेत घेण्यास सांगितले होते. मात्र, फडणवीसांनी यासाठी स्पष्ट नकार दिला होता. ज्यादिवशी ठाकरे सरकार आले तेव्हा परमबीर सिंह यांना फोन करुन सर्वात आधी सचिन वाझेंना सेवेत घेतले. सचिन वाझेंमुळे परमबीर सिंग यांची बदली करण्यात आली, असे नवनीत राणा यांनी म्हटले होते.

क्लिक करा आणि वाचा-
जर अशा पद्धतीने खंडणी वसूल करण्याचे काम सुरू झाले तर संपूर्ण देशातही असे होऊ शकते. महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरुनच हे सगळं सुरू आहे. बदल्या करणे, खंडणी वसुल करणे यामध्ये इतर कोणीही सहभागी नाही. एकट्या मुंबईतून महिन्याला १०० कोटी वसुली होत असेल तर संपूर्ण महाराष्ट्रातून किती होत असेल?, असा प्रश्न उपस्थित करत खासदार नवनीत राणा यांनी लोकसभेतील सदस्यांचे लक्ष वेधले.

क्लिक करा आणि वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here