कोलकाताः पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक सुरू आहे. सर्व पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. आता पश्चिम बंगालमधील मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसच्या एका नेत्याने भारताच्या विभाजनाबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. देशातील सर्व मुस्लिम एकजूट झाल्यास आणखी ४ पाकिस्तान तयार होतील, असं या नेत्याने म्हटंल आहे. हा नेता एवढ्यावरच थांबला नाही तर पुढे जाऊन मोठा दावा केला.

देशातील एकूण लोकसंख्येपैकी ३० टक्के लोकसंख्या मुस्लिमांची आहे. तर ७० टक्के त्यांची (हिंदू) आहे. ७० टक्के लोकसंख्या असल्यामुळे ते सत्तेत येऊ शकतात. पण आपण त्यांना रोखू शकतो. आपण ३० टक्के मुस्लिम एकजूट झालो तर ४ पाकिस्तान तयारी होतील. आणि त्यावेळी ही ७० टक्के लोकसंख्या कुठे जाईल? असं वादग्रस्त वक्तव्य तृणमूल काँग्रेसचे नेते ( ) यांनी केलंय.

भारताच्या विभाजनावरील वादग्रस्त वक्तव्यानंतर आता आणि पक्षाचे नेते शेख आलम यांच्यावर जोरदार टीका होतेय. यानंतर शेख आलम यांनी सारवासारव केली आहे. माझ्या वक्तव्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्याबद्दल आपण दिलगिरी व्यक्त करतो, असं वादग्रस्त वक्तव्य करणारे तृणमूल काँग्रेसचे नेते शेख आलम म्हणाले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here