नवी दिल्ली: दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्ष विजयी होईल असा अंदाज सर्वच एक्झिट पोलने व्यक्त केला आहे. मात्र, भाजपचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष यांनी भाजपच्या विजयाचा दावा केला आहे. मतदानाच्या अखेरच्या तीन तासांत झालेल्या मतदानामुळे भाजप विजयी होणार असल्याचे त्यांनी गणित मांडले आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीत अखेरच्या दोन तासांमध्ये १७ टक्के मतदान झाले असल्याचे मनोज तिवारी यांनी सांगितले. ईव्हीएम मतदानाची आकडेवारी ही दुपारी तीन वाजेपर्यंतची आहे. एक्झिट पोल करणाऱ्या संस्थांनीदेखील ही आकडेवारी तीन वाजेपर्यंतची असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, दुपारी तीन ते सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत भाजपला अनुकूल मतदान झाले असल्याचा दावा मनोज तिवारी यांनी केला आहे. तर, आम आदमी पक्षानेदेखील दुपारी तीननंतर झालेले मतदान आपल्याच बाजूने झाल्याचा दावा केला आहे.

भाजप नेते बी. एल. संतोष यांनीदेखील ट्विट करून एक्झिट पोलच्या अंदाजावर प्रश्न उपस्थित केले आहेत. अखेरच्या काही तासांत झालेले मतदान, ईव्हीएम मशीनबाबत संशय निर्माण होईल असे आपकडून होणारा प्रचार याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.

२४ तासांनी मतदानाची आकडेवारी जाहीर
निवडणूक आयोगाने अखेर २४ तासानंतर दिल्ली विधानसभा मतदानाची टक्केवारी जाहीर केली आहे. दिल्लीत ६२.५९ टक्के मतदान झाले असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली. प्रत्येक बूथमधून मतदानाची आकडेवारी जमा करण्यास वेळ लागला. त्यामुळे मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर करण्यास उशीर लागला असल्याचे निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत म्हटले. मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर न झाल्यामुळे आम आदमी पक्षाने निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित केले होते.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here