अमित शहा यांना पत्रकारांनी शरद पवार यांच्या भेटी बाबत प्रश्न विचारला. सर्वकाही जाहीर करण्यासारखं नसतं, असं सूचक वक्तव्य अमित शहा यांनी केलं आहे. अमित शहांचं वक्तव्य हे शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्या भेटीवर शिक्कमोर्तब करणारं असल्याचं चर्चा आहे. यामुळे महाराष्ट्रात आता राजकीय भूकंप येणार का? असे प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत काही दिवसांपूर्वी अहमदाबादला गेले होते. अहमदाबादमध्ये त्यांची भाजपचे माजी अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत एक गुप्त बैठक झाल्याची चर्चा आहे. एका गुजराती वृत्तपत्राने ही बातमी दिली. त्यावरून अमित शहा यांना आज दिल्ली प्रश्न केला गेला. सर्वकाही जाहीरपणे सांगायचं नसतं, असं अमित शहा म्हणाले आहेत. या आधी शरद पवार, प्रफुल्ल पेटल आणि अमित शहा यांची भेट झालीच नसल्याचा दावा, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी केला होता. सोशल मीडियात सुरू असलेल्या चर्चांमध्ये तथ्य नसल्याचं मलिक म्हणाले होते.
दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुखांविरोधात १०० कोटींच्या खंडणी वसुलीचे आरोप केले आहेत. या प्रकरणी परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय. तसंच परमबीर सिंग यांनी अनिल देशमुखांच्या चौकशीची मागणी करणारी याचिका मुंबई हायकोर्टातही दाखल केली आहे. तर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी ‘सामना’मधून अनिल देशमुखांवर टीकेचे बाण सोडले आहे. पोलीस अधिकारी सचिन वाझे खंडणी वसुली करत होता हे अनिल देशमुखांना माहिती नव्हते? असा सवाल संजय राऊतांनी केला आहे. यामुळे महाराष्ट्रातील राजकारण तापलं आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times