मुंबई: राज्यात दिवसेंदिवस करोना बाधित रुग्णांची वाढ झपाट्याने होत असून, ती रोखण्यासाठी राज्यात एका मर्यादित कालावधीसाठी लॉकडाऊन लागू करण्याचा सरकारचा विचार असून तशी तयारी सुरू करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गेले काही दिवस राज्यातील अनेक मंत्री टाळायचे असल्यास लोकांनी काटेकोरपणे नियम पाळावे, असे वारंवार आवाहन करू लागले आहेत. मुख्यमंत्री यांच्या आदेशनुसार राज्यात अनेक ठिकाणी कडक निर्बंध लागू करण्याबाबतची तयारी करण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. ही दुसऱ्या लॉकडाउनचीच पूर्वतयारी असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. (the is likely to be implemented in the state for a limited period from april 2 to 3 according to government sources)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी करोनाबाबत विचार करण्यासाठी टास्क फोर्सची बैठक बोलावली होती. या बैठकीत लॉकडाउनसारखे उपाय न केल्यास राज्यातील मृत्यूचा आकडा वाढू शकतो, अशी भिती व्यक्त करण्यात आली होती. राज्यात कोविडबाबतचे नियम आणि मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले असून, ही स्थिती अशीच राहिल्यास प्रशासनाने लॉकडाउन लागू करण्याबाबत तयारी सुरू करावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. राज्यात रुग्णालयांमधील बेडची तसेच इतर सोयी सुविधांची कमतरता कमी असल्याने कडक निर्बंधांचा विचार करावा लागेल अशी चर्चा बैठकीत करण्यात आलेली होती.

मात्र, जरी यावेळी लॉकडाउन लागू करण्यात आला तरी देखील या वेळचा लॉकडाउन हा मागील लॉकडाउनपेक्षा वेगळा असेल असे समजते. या लॉकडाउनमुळे आर्थिक क्षेत्रावर मोठा परिणाम होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे, असेही समजते.

क्लिक करा आणि वाचा-
सरकारने नव्या प्रकारच्या लॉकडाउनचा निर्णय घेतल्यास लोकांची ज्या ठिकाणी मोठी गर्दी होते अशी ठिकाणी बंद ठेवण्यावर भर दिला जाणार आहे. लॉकडाउन लागू झाल्यास मल्टिप्लेक्स, सिनेमा हॉल, बीच, गार्डन्स, सभागृह आणि मॉल्स पूर्णपणे बंद ठेवण्यात येतील. तसेच स्टँडअलोन शॉप्स चालविण्यासाठी विशिष्ट वेळा दिल्या जातील. तसेच मोठ्या बाजारपेठा कडक मार्गदर्शक सूचनांचे पालन करूनच सुरू राहतील असे समजते.

क्लिक करा आणि वाचा-
दुसरा लॉकडाउन लागू झाल्यास उपनगरीय रेल्वे वाहतूक, तसेच लांब पल्ल्याच्या गाड्या आणि सार्वजनिक परिवहन बस सेवांना कडक नियमांचे पालन करावे लागण्याची शक्यता आहे. तसेच रेल्वे स्थानक आणि विमानतळांवर चाचण्या अधिक काटेकोरपणे करण्यात येतील. उत्पादन क्षेत्र बंद करण्यात येणार नसले तरी देखील त्यांना कडक नियमांचे पालन करणे अनिवार्य असणार आहे.

क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here