मुंबईः राज्यात गेल्या काही दिवसांपासून करोनानं पुन्हा एकदा थैमान घातले असून गेल्या २४ तासांत ३९ हजार ५४४ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर, २२७ करोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. ( )

राज्यात मंगळवारी २७ हजार ९१८ रुग्णांचे निदान झाल्यानंतर राज्याला काही प्रमाणात दिलासा मिळाला होता. मात्र, आज पुन्हा एकदा बाधितांची संख्या वाढली आहे. त्याचबरोबर करोना मृतांचा आकडाही आज वाढला आहे. नवीन बाधित, अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आणि मृतांचा आकडाही वाढत असल्यानं आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनाची चिंता वाढली आहे.

राज्यात आज करोनानं आणखी २२७ रुग्ण दगावले असून एकूण मृतांचा आकडा ५४ हजार ६४९ इतका झाला आहे. तर, राज्यातील मृत्यूदर १. ९४ इतका आहे. राज्यात सध्या ३ लाख ५६ हजार २४३ अॅक्टिव्ह रुग्ण उपचार घेत असून राज्यातील विविध रुग्णालयांत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,९७,९२,१४३ प्रयोगशाळा नमनुयाांपैकी २८,१२,९८० (१४.२१टक्के) नमनु पॉझिटिव्ह आले आहेत.

वाचाः

गेल्या २४ तासांत एकूण २३ हजार ६०० रुग्ण बरे झाले आहेत. तर, आत्तापर्यंत एकूण २४ लाख ७२७ जणांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामुळं राज्यातील रिकव्हरी रेट ८५. ३४ टक्के इतका झाला आहे. सध्या राज्यात १७,२९,८१६ व्यक्ती होम क्वारांटाईनमध्ये आहेत तर १७,८६३ व्यक्ती संस्थातमक क्वारांटाईनमध्ये आहेत.

वाचाः

मुंबईत आज ५ हजार ३९४ नवे रुग्ण

आज मुंबईत ५ हजार ३९४ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर, १५ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत ५१ हजार ४११ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर, आज ३ हजार १३० जणांनी करोनावर मात केली आहे.

ठाणे जिल्ह्यात १९ रुग्ण दगावले

जिल्ह्यात बुधवारी नवीन ३ हजार १७१ करोना रुग्णांची वाढ झाली. तर २ हजार १०९ रुग्ण करोनामुक्त झाले असले तरी १९ रुग्णांचा झालेल्या मृत्यूने चिंतेत अधिकच भर पडली आहे. जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ३ लाख १९ हजार ११ वर पोहचली असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या २ लाख ८१ हजार ६४१ इतकी आहे. सध्या ३० हजार ९०१ रुग्ण उपचार घेत आहेत. करोनाबळींचा आकडा वाढत ६ हजार ४६९ वर गेला आहे. दरम्यान दिवसभरात ठाणे शहरात ९९५ रुग्णांची वाढ (५ मृत्यू), कल्याण-डोंबिवली ८५५ (३), नवी मुंबई ५५४ (४), मिरा-भाईंदर २३३ (२), उल्हासनगर १७८, भिवंडी ७४ (४), अंबरनाथ १०९, बदलापूर १२४, ठाणे ग्रामीणमध्ये ४९ (१) रुग्ण आढळले आहेत.

करोना चाचण्यांचे दर कमी

दरम्यान, राज्यात खासगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात येणाऱ्या करोना चाचण्यांचे दर पुन्हा एकदा सुधारित करण्यात आले असून आता करोना निदानासाठी करण्यात येणाऱ्या आरटीपीसीआर चाचणीसाठी ५०० रुपये आकारण्यात येणार आहे. याबरोबरच रॅपीड अँटीजेन अँटीबॉडीज तपासणीचे दर देखील कमी करण्यात आले असून अँटीजेन टेस्ट १५० रुपये करण्यात येणार आहे. यासंदर्भात आरोग्य विभागाने शासन निर्णय देखील जाहीर केला आहे

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here