राज्यात लॉकडाउन लागू करणे हे घातक आहे याची मला कल्पना आहे. लॉकडाउन लागू केला तर त्याचा अर्थचक्रावर नक्कीच परिणाम होईल. पण असे केले नाही, तर करोना थोपवायचा कसा हा देखील प्रश्न आहे. एका विचित्र कात्रीत आपण सापडलो आहोत. असे मुख्यमंत्री म्हणाले. राज्य सरकार प्रयत्न करत आहे. विरोधकांनीही राजकारण न करता सरकारला सहकार्य करावे असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
क्लिक करा आणि वाचा-
केवळ लस घेणे, चाचण्या वाढवणे हा करोनाला हरवण्याचा उपाय नाही, असे सांगत असताना मात्र रुग्णवाढ थांबवण्यासाठी कोणी उपाय सांगत नाही असेही मुख्यमंत्री म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा-
‘लसीकरणात महाराष्ट्र देशात प्रथम’
आपण काहीही लपवणार नाही, राज्यातील एकही रुग्ण लपवला नाही आणि लपवणारही नाही, असे सांगताना मुख्यमंत्र्यांनी राज्यातील एकूण परिस्थितीचा आढावा घेतला. काल एका दिवसात महाराष्ट्राने तीन लाख नागरिकांचे लसीकरण केले आहे. यात महाराष्ट्र देशात पहिले राज्य ठरले आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. राज्यात विलगीकरण बेड २ लाख २० हजार आहेत. आताच ६२ टक्के बेड भरले गेले आहेत. आयसीयू बेड राज्यात २०,५१९ आहेत, त्यातील ४८ टक्के भरले आहेत. ऑक्सिजनचे बेड ६२ हजार २५ इतके आहेत, असे सांगत फिल्ड रुग्णालय उभारणारे महाराष्ट्र हे देशात पहिले राज्य ठरले असल्याचेही ते पुढे म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times