मुंबईः राज्यात करोना संसर्गानं पुन्हा डोकं वर काढलं आहे. त्यामुळं राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागणार का अशी शक्यता असतानाच एकीकडे भाजपनं लॉकडाऊनला विरोध केला आहे. यावरुनच राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे,

पुण्यातील मिनी लॉकडाऊन आणि मुख्यमंत्र्यांनी दिलेला लॉकडाऊनचा इशारा यावरुन यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. ‘करोना नियंत्रणात संपूर्णपणे अपयशी ठरलेल्या ठाकरे सरकारने आपलं अपयश लपवण्यासाठी पुण्यात लॉकडाऊन जाहीर केला आहे. लॉकडाऊन लावला तर आपलं अपयश झाकता येईल, असं या लबाड सरकारला वाटतं. पण या लॉकडाऊनमुळं हातावर पोट असणाऱ्या सर्वसामान्य जनतेचं काय होणार? याचा विचार आधी या सरकारने करायला हवा,’ असं पाटील चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

‘पहिल्या लॉकडाऊनमधून सावरत सावरत आता कुठे सर्वसामान्य जनतेचं जीवन रुळावर येत होते. परंतु आता या सरकारच्या मुर्खपणामुळं पुन्हा एकदा गोरगरिब जनतेची पिळवणूक होणार आहे. आपलं अपयश झाकण्यासाठी केंद्राकडे बोट दाखवणाऱ्या या लबाड सरकारने पुन्हा लॉकडाऊन कराताना जनता जुमानत नसल्याचं कारण देऊन यावेळी जनतेवर आपल्या अपयशाचं खापर फोडलं आहे,’ असंही चंद्रकात पाटील यांनी म्हटलं आहे.

‘जगात जिथे जिथे पुन्हा कठोर लॉकडाऊन करण्यात आलं तिथल्या सरकारने त्यांच्या जनतेसाठी मदतीसाठी भरघोस पॅकेजदेखील आधी पोहचवले होते, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं असून यांच्या नावानं टॅग करत थोडा अभ्यास करत जा,’ असा खोचक टोला लगावला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here