आज राज्यात एकूण १५५ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल ही संख्या २२२ इतकी होती. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८३ टक्के इतका आहे. याबरोब राज्यात आज २६ हजार २५२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत एकूण २५ लाख ४९ हजार ०७५ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८३.३६ टक्क्यांवर आले आहे.
क्लिक करा आणि वाचा-
राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या साडे चार लाखांच्या पुढे
राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ४ लाख ५१ हजार ३७५ इतकी झाली आहे. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ८१ हजार ३७८ इतके रुग्ण आहेत. मुंबई पालिका हद्दीत हा आकडा ७३ हजार २८१ इतका आहे. ठाणे जिल्ह्यात सध्या ५७ हजार ६३५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर नागपूर जिल्ह्यात ही संख्या ५५ हजार ९२६ इतकी झाली आहे. नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ३४ हजार ५४० इतकी आहे.
क्लिक करा आणि वाचा-
या बरोबरच औरंगाबादमध्ये १६ हजार ८१८, अहमदनगरमध्ये १५ हजार ७१६ इतकी आहे. तसेच नांदेडमध्ये ही संख्या ११ हजार २९९ इतकी आहे. जळगावमध्ये ७ हजार १४१, तर रायगडमध्ये एकूण ५ हजार ८५९ इतके सक्रिय रुग्ण आहेत. अमरावतीत ही संख्या ३ हजार ४९८, तर, कोल्हापुरात सक्रिय रुग्णांची संख्या १ हजार १३८ इतकी आहे. राज्यात सर्वात जास्त सक्रिय रुग्णांची संख्या पुण्यात आहे. तर, सर्वात कमी सक्रिय रुग्णांची संख्या गडचिरोली जिल्ह्यात आहे. येथे सक्रिय रुग्णांची संख्या ५२६ इतकी आहे.
क्लिक करा आणि वाचा-
२४,१६,९८१ व्यक्ती होम क्वारंटाइन
आतापर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी ०७ लाख १५ हजार ७९३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३० लाख ५७ हजार ८८५ (१४.७६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २४ लाख १६ हजार ९८१ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, २० हजार ११५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times