बुलडाणा: राज्यात करोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासन करोशीने प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे वैद्यकीय साधने आणि सोईसुविधा पुरवणे हे देखील राज्य सरकारपुढे अव्हान आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात एकीकडे करोना प्रतिबंधक लशीचा साठाही कमी होत असताना दुसरीकडे रेमडेसीविर इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे. राज्यात सध्या रेमडेसीविरच्या ५० हजार इंजेक्शन उपलब्ध असून १७ एप्रिलपर्यंत ७० हजार इंजेक्शन उपलब्ध होणार आहेत. मात्र सध्याचा ५० हजाराचा आकडा कमी असून तो वाढविण्याच्या दृष्टीवे प्रयत्न करत असल्याचे राज्याचे अन्न व औषधी प्रशासनमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी सांगितले. (only 50,000 remedesivir injections available in the state says )

अन्न व औषध प्रशासन मंत्री शिंगणे हे बुलडाण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. आखून दिलेल्या नियमानुसारच रुग्णांना दिले जावे अशा सूचना आपण दिल्या असल्याचे शिंगणे म्हणाले. काही खाजगी डॉक्टर रुग्ण दवाखान्यात दाखल होताच त्याला रेमडेसिवीर इंजेक्शन देतात. नियमाप्रमाणे एका रुग्णाला फक्त ६ इंजेक्शन द्यायचे असतात. इंजेक्शनचा साठा लक्षात घेता ज्यांना आवश्यकता आहे अशाच रुग्णांना डॉक्टरांनी इंजेक्शन द्यावे, अशा सूचनाही डॉक्टरांना देण्यात येणार आल्याचे त्यांनी सांगितले.

क्लिक करा आणि वाचा-
खाजगी डॉक्टर कोरोना उपचारासाठी काही रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा पैसे आकारत असल्याची उदाहरणे पाहायला मिळतात. याबाबत डॉ. शिंगणे यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, खाजगी रुग्णालयांसाठी एक दरपत्रक निश्चित करण्यात आले आहे. त्या दरपत्रकानुसारच रुग्णांकडून पैसे घेणे अपेक्षित आहे. रुग्णांनी बरे झाल्यानंतर डॉक्टरांना पैसे देण्यापूर्वी बिलाची तपासणी करावी. आकारण्यात आलेले पैसे बरोबर आहेत का याची खात्री करन घ्यावे आणि मगच पैसे द्यावेत असे आवाहनही यांनी रुग्णांच्या नातेवाईकांना केले आहे.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here